पेन्सिलची भिंत , शिक्षणाची दिशा देणारे प्रतीक, ॲड जमील देशपांडे…

जळगांव येथील लांडोरखोरी उद्यानात उभी केलेली पेन्सिलची भिंत पाहताना क्षणभर थांबावं लागतं. रंगीबेरंगी, उंचच उंच पेन्सिल ची भिंत सांगते, थांबा-शिका- लिहा आणि मगच पुढे जा..
पेन्सिल ही साधी वस्तू. पण तिच्यात माणसाला घडवणारी अपार शक्ती दडलेली आहे. तिच्या टोकावरून उमटणारे अक्षर केवळ कागद रंगवत नाही, तर विचार घडवतं, स्वप्नं साकारतं. पेन्सिलची धार जशी घासून-घासून तीक्ष्ण करावी लागते, तसंच आयुष्य ज्ञानाने, अनुभवाने परिपक्व होतं.
या भिंतीतून शिक्षणाचं महत्त्व जिवंत झालं आहे. निसर्गाच्या कुशीत उभ्या राहिलेल्या या पेन्सिली मुलांना, पालकांना आणि प्रत्येक पर्यटकाला सांगतात की शिक्षणाशिवाय प्रगती नाही.लिहिलेलं अक्षर हेच माणसाचं खरं वैभव आणि शिकत राहणं म्हणजेच सतत वाढत राहणं.
ही भिंत म्हणजे एक प्रतीक आहे माणसाच्या विकासाचा, ज्ञानाच्या वाटचालीचा. जंगलातल्या हिरव्या श्वासात उभी राहून ती जणू आपल्याला सतत स्मरण करून देते की “विद्या हीच खरी संपत्ती आहे.”









