मित्राच्या बायकोचा नाद, कोल्हापूर NCP नेत्याच्या मर्डरचं गूढ उलगडलं, महिलेसह पाच जणांना अटक.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लखन बेनाडे यांचा धक्कादायक खून उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. नेमकं काय प्रकरण जाणून घ्या.हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते लखन आण्णाप्पा बेनाडे (वय 36) यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू करताना या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. बेनाडे यांचा मित्र विशाल घस्ते, त्याची पत्नी लक्ष्मी तसेच आणखी तीन साथीदारांनी अपहरण करून खून करत मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे.कोल्हापूरमधील लखन बेनाडेचा मित्र असेलल्या विशाल घस्ते याला दोन वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात अटक झाली होती. त्या काळात त्याची पत्नी लक्ष्मी हिने बचत गटाच्या कर्जासाठी लखन बेनाडे यांची मदत मागितली. यावेळी लखनने तिचा गैरफायदा घेतला आणि शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप पुढे आलं आहे.

आरोपानुसार, लखन तिचे व्हिडिओ तयार करून मानसिक त्रास देत धमकावत राहिला. त्यानंतर काही काळ लक्ष्मी ही लखनसोबत राहू लागली होती.विशाल जेलमधून परत आल्यावर लक्ष्मीने घर सोडून नवे वास्तव्य सुरू केले. पण लखनने दोघांवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत तक्रारी करून त्रास देणे सुरूच ठेवले. वैयक्तिक राग, सूड आणि सततचा त्रास यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. 10 जुलै 2025 रोजी लखनने लक्ष्मीला भेटण्यासाठी बोलावले होते. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर, लक्ष्मीने विशालला संपर्क करून या त्रासाचा कायमचा शेवट करण्याचा निर्णय घेतला. विशालने आपल्या साथीदार आकाश उर्फ माया घस्ते, संस्कार सावर्डे आणि अजित चुडेकर यांना बोलावून लखनचा पाठलाग सुरू केला. सायबर चौकात तो दिसताच त्याच्या तवेरा गाडीतून पाठलाग करण्यात आला. शाहू टोल नाक्यावर त्याला जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आलं आणि त्यानंतर संकेश्वरजवळच्या नदीकाठावर नेऊन त्याचा निर्घृण खून करण्यात आला. मृतदेह अर्धवट जाळून नदीत फेकण्यात आला.लखन बेनाडे यांचा गुन्हा उलगडण्यामागे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे सतर्क काम होते. जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींविषयी माहिती घेण्याच्या मोहिमेदरम्यान पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे विशाल घस्ते याचा शोध घेतला असता तो उजळाईवाडी येथील कार वॉश सेंटरमध्ये सापडला. प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या तपशिलांवरून खुनाची कहाणी पुढे आली. पोलिसांनी तत्काळ त्याचे तीन साथीदार आणि पत्नी लक्ष्मीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.लखन बेनाडे यांच्या हत्येने रांगोळी गावासह हातकणंगले तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक राजकीय नेत्यांतूनही हत्येच्या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त होत आहे. एक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या परिचित व्यक्ती इतक्या क्रूर पद्धतीने ठार मारली गेल्याने समाजमन हादरले आहे.पोलिसांच्या ताब्यात असलेले संशयित आरोपी हे आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, त्यांच्यावर पूर्वीच गुन्हे दाखल आहेत. सध्या गुन्ह्याचा तपास राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून मृतदेहाचे अवशेष, हत्येसाठी वापरलेली गाडी आणि अन्य पुराव्यांचा शोध घेतला जात आहे.

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..