विदर्भाला पूरधक्का, पाचजण वाहून गेले, कारवर झाड कोसळलं, दोघांचा मृत्यू.

 विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सततचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपुरात अनेक भागात पाणी साचलं आहे. तर, गोंदियात कारवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात तीन दिवसांपासून कोसळणारी पावसाची संततधार बुधवारी दुपारनंतर थांबली. मात्र या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांतील पाच जण वाहून गेले. तर गोंदिया जिल्ह्यात कारवर झाड कोसळून दोन जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. पुरात अडकलेल्यांसाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत मदत आणि बचावकार्य सुरू होते.
नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव उगले परिसरात कार्तिक शिवशंकर लाडसे (१८) रा. उप्पलवाडी हा युवक बुधवारी पहाटे गावातील नाला पार करीत असताना पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. पोलिस व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला. दुसरी घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव बुजुर्ग येथे घडली. अनिल हनुमंत पानपत्ते (३५) हे बुधवारी सकाळी गावातील नाला पार करीत असताना वाहून गेले.

रात्री उशिरापर्यंत बचाव पथके त्यांचा शोध घेत होते.वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील बोदरठाण येथील नाल्याला आलेल्या पुरात प्रफुल्ल शेंद्रे (३५) यांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. यवतमाळच्या झरी-जामणी तालुक्यातील धानोरा येथील नाल्याला आलेल्या पुरात सतीश दुर्गावार (वय ३५) हे वाहून गेले. दुर्गावार हे बुधवारी सकाळी शेतावर जाण्यासाठी घरून निघाले होते. नाल्यातून जात असताना त्यांचा तोल गेल्याने वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील देशपूर येथील राजू तुमराम हे शेतावरून घरी परत येत असताना वडदा गावाजवळ नाल्याच्या पुरात वाहून गेले. प्रशासनाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.गोंदिया-सडक अर्जुनी मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेले एक झाड कारवर कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले. वासुदेव मसाराम खेडकर (६०) आणि आनंद मनिराम राऊत (५०) रा. सडक-अर्जुनी अशी मृतांची नावे आहेत.

तर रितिक राजेश दिघोरे (२२) रा. सडक-अर्जुनी व राजू रूपलाल चौरागडे (४६) व अनिल रामकिसन चौधरी (४६) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना सडक-अर्जुनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताने या मार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती.मुसळधार पावसामुळे गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर चिखल पसरल्याने वाहन येऊ शकत नव्हते. परिणामी एका वृद्धाला खाटेवरून रुग्णालयात न्यावे लागल्याची संतापजनक घटना यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील जनुना वरुडबिबी येथे बुधवारी घडली. बाबुराव मेंढके (६७) असे या रुग्णाचे नाव आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.