नाशिकमध्ये रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिर पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. राज्यात बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे .काही धरणांमधून विसर्ग सुरू झालाय. राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे . धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीत वाढ झाली आहे . गंगापूर धरणातून दुपारी बारा वाजता 3716 वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरीत सुरू झालाय . नाशिकमध्ये रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिर पुन्हा पाण्याखाली गेले आहेत . दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पुराचे पाणी लागले आहे . दुसरीकडे आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांमुळे उजनी धरणात होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलाय . राज्यात बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे .काही धरणांमधून विसर्ग सुरू झालाय .नदीच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे .










