छत्रपती संभाजीनगर-वंदे भारत रेल्वे नांदेडपर्यंत पुढे नेली असाच प्रयोग जनशताब्दी बाबत करावा. अशी मागणी अंबादास दानवे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांकडे केली आहे.नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जालना ते मुंबई रेल्वेने प्रवास करणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडहून धावणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सोबतच ही गाडी आता नांदेड-मुंबई एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणार असून या गाडीला परभणी रेल्वे स्थानकातही थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाश्यांना ही रेल्वेसेवा सोयीची ठरणार आहे. साहजिकजच या नव्या निर्णयामुळे गाडीच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. ही गाडी छत्रपती संभाजीनगरहून सकाळी सव्वाआठ वाजता मुंबईच्या दिशेने निघेल.दरम्यान, याचं मुद्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी छत्रपती संभाजीनगर-वंदे भारत रेल्वे नांदेडपर्यंत पुढे नेली असाच प्रयोग जनशताब्दी बाबत करावा.










