मुंबई का किंग सूर्या दादा! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत भीमपराक्रम, १५ वर्षांनी इतिहास बदलला.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यात पंजाबने विजय मिळवला, परंतु सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतकी खेळी करत विक्रम रचला. मुंबई इंडियन्ससाठी IPL च्या एका सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.आयपीएलमधील ६९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये पार पडला. या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने बलाढ्य मुंबईला नमवत विजय साकार केला. मुंबईने दिलेल्या १८४-७ धावांचा पाठलाग करताना पंजाबने १७.३ ओव्हरमध्ये १८७-३ लक्ष्य पू्र्ण केले. या विजयासह पंजाब संघाने टॉप २ मधील आपले स्थान पक्के केले आहे. या सामन्यामध्ये मुंबईचा पराभव झाला असला तरी स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव याने ५७ धावांची महत्त्वाची खेळी करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडला आहे.सूर्यकुमार यादव यांने पंजाब किंग्स विरुद्ध ३९ चेंडूत ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. ज्यात ६ चौके आणि २ षटकारांचा समावेश होता. या खेळीसह त्यांनी मुंबई इंडियन्ससाठी एकाच सीजनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा तेंडुलकरचा विक्रम मोडला.

सूर्यकुमारने या सीजनमध्ये १४ सामन्यात ६४० धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजीची नवी परिभाषाच सूर्याने तयार केली आहे. सूर्याकडे प्रत्येक गोलंदाजासाठी आपल्या भात्यामध्ये नवनवीन शॉट्स आहेत.सूर्यकुमार यादवने यावर्षी मुंबई इंडियन्ससाठी खूपच चांगले प्रदर्शन केले आहे. त्यांनी आतापर्यंत १४ सामन्यात एकूण ६४० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने बॅटमधून पाच अर्धशतके केली आहेत. यात पंजाब किंग्सविरुद्ध केलेल्या अर्धशतकाचाही समावेश आहे. सूर्यकुमार मुंबई इंडियन्ससाठी IPLच्या एका सीजनमध्ये सर्वात जास्त धावा बनवणारा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. सचिनने IPL २०१० मध्ये ६१८ धावा केल्या होत्या.

आता सूर्याने मुंबई इंडियन्ससाठी हा ताज आपल्या नावावर केला आणि तेंडुलकरचा १५ वर्षे जुना विक्रम मोडला आहे.सूर्यकुमार यादव २०१८ पासून मुंबई इंडियन्स टीमकडून खेळत आहेत. यापूर्वी ते केकेआर टीमचा भाग होते. आतापर्यंत आयपीएलच्या १६४ सामन्यात ४२३४ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि २९ अर्धशतके लगावली आहेत. सूर्यकुमार एकदा क्रीजवर टिकला की त्याला रोखणे कठीण जातं, हे प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाला माहिती असतं. त्यामुळे त्याला लवकर आऊट करण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. मात्र आता प्ले ऑफच्या नॉक आऊट सामन्यात सूर्याकडून सर्वांना अपेक्षा असणार आहेत.

  • Related Posts

    दुहेरी निष्ठा : राजकीय प्रवासातील असंतुलित विचारधारा..

    दुहेरी निष्ठा : राजकीय प्रवासातील असंतुलित विचारधारा.. राजकारणात निष्ठा ही फक्त शब्दांची जुळवाजुळव नसते; ती प्रत्येक कार्यकर्त्याच्या अस्तित्वाचा पाया असते. मनात संभ्रम निर्माण झाला, परिस्थिती दोलायमान झाली आणि स्वतःच्या नेत्यावरचा…

    मुंबईत तब्बल 11 लाख दुबार मतदार; प्रारुप मतदारयादीतून धक्कादायक माहिती उघड..

    दुबार मतदारांवरून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई: दुबार मतदार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..