मुंबईत १०० वर्षात घडलं नाही ते काल घडलं, ठिकठिकाणी जलमय; मुंबईकरांची पायपीट.

मान्सून वेळेआधीच मुंबईत धडकला, गेल्या ७५ वर्षांतील हा विक्रमी प्रवास ठरला. मुंबईत १०० वर्षात कधीही न घडलेलं काल घडलं. जोरदार पावसामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली.अपेक्षित वेळेपूर्वीच देशात दाखल झालेला मान्सून केरळनंतर वेगाने आगेकूच करत सोमवारी मुंबईत धडकला. मुंबईत मान्सून दाखल होण्याचे सर्व निकष पूर्ण झाले असून, गेल्या ७५ वर्षांमधील मान्सूनचा हा विक्रमी प्रवास आहे. एरवी मान्सूनच्या आगमनाने सुखावणाऱ्या मुंबईकरांना या पावसाने अक्षरशः जेरीस आणले. मान्सूनने आगमनालाच दाणादाण उडवल्याने यंत्रणांची पुरेशी तयारी नसल्याचे उघड झाले.मुंबईतील महामार्ग आणि द्रुतगती मार्ग तसेच उपनगरी रेल्वे या पहिल्याच पावसात कोलमडली. त्यामुळे अनेकांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागली. विशेष म्हणजे या पावसाचा परिणाम मेट्रो वाहतुकीवरही झाला. कर्जत तालुक्यात वीज पडून एका तरुणाचा, तर विरारमधील एका धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला.

या महिलेची दोन लहान मुले किरकोळ जखमी झाली आहेत. कर्जत तालुक्यातही एका महिलेसह दोन जण जखमी झाले. दापोलीत ४५ वर्षीय तरुण नदीत वाहून गेला.हवामान खात्याने मुंबईला सोमवारी ऑरेंज अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे, पहाटेपासून पावसाचे आगमन झाले आणि काही वेळातच मुंबईसह महानगरात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस कोसळू लागला. रविवारी रात्रीपासून मुंबई शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा हा जोर दुपारी ४ पर्यंत कायम होता.मुंबईत रविवारी सकाळी ९.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या २४ तासांत कुलाबा केंद्रावर १३५.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रावर ३३.५ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. सोमवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत कुलाबा येथे १४४.३ आणि सांताक्रूझ येथे ७४.३ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. ठाणे, नवी मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावली.

मुंबईत मान्सूनचे आगमन लवकर झाले, मे महिन्यात १०० वर्षातील सर्वात जास्त पाऊस पडला. १०० वर्षात कधीही न पडलेला इतका पाऊस काल सोमवारी मुंबईत मे महिन्यात झाला.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कित्येकांनी घरून काम करण्याचा निर्णय घेतला. अनेकांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागली. तर, ज्यांना व्यवसाय, नोकरीसाठी घराबाहेर पडणे भाग होते, त्यांना बरेच हाल सोसावे लागले. पश्चिम रेल्वेने चांगल्या प्रकारे तग धरला, तरीही ती लोकलसेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने होती. पावसाच्या जोरदार तडाख्याने मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचे पितळ उघडे पडले. या पावसाने दादर, हिंदमाता, शीव, भायखळा, सँडहर्स्ट रोड, मशीद, वडाळा, अंधेरी, मंत्रालय परिसर, हुतात्मा चौक, चर्चगेट स्थानक अशा कित्येक भागांत पाणी साचल्याने पादचारी आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

  • Related Posts

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    दुहेरी निष्ठा : राजकीय प्रवासातील असंतुलित विचारधारा..

    दुहेरी निष्ठा : राजकीय प्रवासातील असंतुलित विचारधारा.. राजकारणात निष्ठा ही फक्त शब्दांची जुळवाजुळव नसते; ती प्रत्येक कार्यकर्त्याच्या अस्तित्वाचा पाया असते. मनात संभ्रम निर्माण झाला, परिस्थिती दोलायमान झाली आणि स्वतःच्या नेत्यावरचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..