महिलांसाठी प्रबोधन समिती गठीत व्हावी यासाठी मनसेने दिले रूपाली चाकणकर यांना निवेदन
आशिष उत्तमराव सपकाळे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव उप महानगराध्यक्ष आपणास एका महत्त्वाच्या विषयावर निवेदन देवी इच्छितो आणि लक्ष केंद्रित करू इच्छितो ,काही वर्षापासून जळगाव जिल्हा मध्ये तरुणी ज्यांचे वय वर्ष 14 ते 27 -28 वयातील विद्यार्थिनी व महिलांवर अत्याचाराचे आत्महत्येचे व कमी वयात पळून जाण्याचे घर सोडून पळून जाण्याचे प्रमाण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहे , तरी या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे 13 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना या संदर्भात प्रबोधन समिती घटित व्हावी यासाठी आमच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले होतं, तसेच 8 सप्टेंबर 2024 रोजी राज्यपाल महाराष्ट्र सी. पी. राधाकृष्णन यांच्याही जळगाव दौऱ्यावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडला असता त्यांनी अस्वस्थ केलं की विषयात अति गांभीर्य असून याच्यावर चर्चा करून अति जलद निर्णय घेण्यात येईल, अशी त्यांनी ग्वाही दिली होती .
त्या अनुषंगाने आपण महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि एक सबल नेतृत्व असलेले महिला असून त्यासाठी आम्ही तुमच्याकडे विद्यार्थिनींचा महिलांचा असा प्रकार थांबवावा.










