ऐतिहासिक गोपाळगडावर पुरातत्व विभागाची मोठी कारवाई; शिवप्रेमींची मागणी अखेर पूर्ण, प्रकरण काय?

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील गोपाळगड किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम अखेर प्रशासनाने जमीनदोस्त केले. पुरातत्व विभागाने केलेल्या या कारवाईत दुकान, घर, पाण्याची टाकी आणि इतर बांधकामे जेसीबीने पाडण्यात आली.कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील राज्य संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपाळगड किल्ल्यावरील अवैध बांधकाम अखेर आज जमीनदोस्त झाले. २ एप्रिल २०२५ नंतर बांधकाम पडणार हे निश्चित होते. मात्र प्रत्यक्षात कारवाई होत नव्हती. अखेर शनिवारी (ता. २४) पुरातत्व विभाग रत्नागिरीचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली किल्ल्यावरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यामध्ये तेथील जागा मालकाने २०२४ मध्ये अनधिकृत बांधकाम केले होते. सदर अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची अंतिम सूचना सहाय्यक संचालक, पुरातत्व विभागीय कार्यालय रत्नागिरी यांनी १७ मार्च २०२५ रोजी सुफिया युनूस मणियार आणि कादिर हुसेन मण्यार यांना देण्यात आली होती. सदर नोटीसीवर म्हणणे मांडण्यासाठी २ एप्रिल २०२५ पर्यंतची मुदत दिली होती. परंतू कोणतेच म्हणणे सादर झालेले नाही. त्यामुळे किल्ल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा मार्ग मोकळा झाला होता.अखेर शनिवारी (ता. २४) पुरातत्व विभाग रत्नागिरीचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोपाळगड किल्ल्यातील दुकान, घर, पाणी साठवण्याची टाकी, २ स्वच्छतागृहे, आणि आंबे ठेवण्यासाठी उभारण्यात आलेला चिरेबंदी मांडव जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस तैनात करण्यात आले होते.तहसीलदार परिक्षित पाटील यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी हे देखील उपस्थित होते. दरम्यान इतिहासाचा अभ्यासक अक्षय पवार यांनी या कारवाईचे स्वागत केले असून उशिरा का होईना पण प्रशासनाला जाग आली व ही कारवाई झाली आहे, ही कारवाई यापूर्वीच होणं आवश्यक होतं अशी प्रतिक्रिया अक्षय पवार यांनी दिली.शिवतेज फौंडेशनच्या वतीने किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आल्याने फटाके आणि पेढे वाटून जल्लोष केला. गोपाळगड किल्ल्यावर असणारे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने बंदोबस्तात तोडले. त्यामुळे गेल्या अनक वर्षापासून असणारी शिवप्रेमींची मागणी पूर्ण झाली.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.