चिदंबरम यांनी भाषणात सहा वेळा भाजप बलाढ्य पक्ष आहे, असा उल्लेख केला, याकडे लक्ष वेधून मालवीय यांनी म्हणाले, की ‘चिदंबरम यांनी भाजपबाबत केलेल्या या विधानाचा व्हिडीओ केवळ तीन मिनिटांतच हटविण्यात आला. ‘सातत्याने झालेल्या पराभवामुळे काँग्रेस भयभीत झाला आहे. चिदंबरम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा स्वरूपाची कबुली व्यक्त करणे हे पक्षातील निराशेचे द्योतक आहे,’ असे मालवीय यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. ‘चिदंबरम यांनी भाषणात सहा वेळा भाजप बलाढ्य पक्ष आहे,’ असा उल्लेख केला, याकडे लक्ष वेधून मालवीय यांनी म्हणाले, की ‘चिदंबरम यांनी भाजपबाबत केलेल्या या विधानाचा व्हिडीओ केवळ तीन मिनिटांतच हटविण्यात आला.
’सलमान खुर्शीद आणि मृत्युंजयसिंह यादव यांनी लिहिलेल्या ‘कन्टेस्टिंग डेमोक्रॅटिक डेफिसिट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी गुरुवारी चिदंबरम यांनी, ‘भाजप बलाढ्य असून, त्यांची निवडणूक यंत्रणाही तशीच महाकाय आहे. मृत्युंजयसिंह यादव यांनी उल्लेख केल्याप्रमाणे इंडिया आघाडीचे भवितव्य काही फारसे चांगले नाही. आघाडी अजून तरी एकत्र आहे, पण ती किती काळ राहील हे सांगता येणार नाही,’ असे म्हटले होते.दरम्यान, पी. चिदंबरम यांच्या या भूमिकेला सलमान खुर्शीद यांनीही दुजोरा दिला.
‘आम्ही इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी आमच्या स्वत:च्या (काँग्रेस पक्षाच्या) स्थानाचा त्याग केला, असे खुर्शीद यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.‘भारतीय जनता पक्ष हा बलाढ्य पक्ष आहे आणि इंडिया आघाडीचे भवितव्य धूसर आहे,’ असे विधान काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केल्यानंतर भाजपने त्यावरून काँग्रेस व इंडिया आघाडीला लक्ष्य केले आहे. पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.









