‘भारताकडून २४ तासांत हल्ला’, पाक मंत्र्यांचा दावा; भारतानेच संघर्षाचा मार्ग निवडल्याची मल्लिनाथी.

पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्ला तरार यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. भारत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला. पहलगाम हल्ल्याच्या आधारावर भारत सरकार कारवाई करू शकते, असा इशारा त्यांनी दिला. ‘पाकिस्तान स्वत: दहशतवादाने पीडित आहे. देशाने नेहमीच दहशतवादाच्या सगळ्या स्वरूपांचा निषेध केला आहे. पाकिस्तानने आयोगाद्वारे विश्वासार्ह, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशीचा प्रस्ताव ठेवला आहे, पण भारत तपास टाळत आहे आणि संघर्षाचा मार्ग निवडत आहे,’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्ला तरार यांनी केली. भारत आगामी २४ ते ३६ तासांत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याची योजना आखत असल्याची माहिती विश्वसनीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

‘पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याबाबतच्या निराधार आरोपांच्या आधारे भारत सरकार हल्ल्ल्याची तयारी करत आहे,’ असे तरार यांनी म्हटले आहे. ‘आंतरराष्ट्रीय समुदायाला सतर्क राहायला हवे. भारतीय सैन्याने केलेल्या कोणत्याही कारवाईला निश्चित आणि निर्णायक उत्तर दिले जाईल. संघर्षाची स्थिती वाढण्याची आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी पूर्णपणे भारताची असेल,’ असा पोकळ इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सैन्य दलांना पूर्ण मोकळीक दिली आहे. ‘दहशतवादी आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांना शोधून भारत त्यांना शिक्षा करेल,’ असा इशारा मोदी यांनी दिला. यानंतर पाकिस्तानकडून हल्ल्याची पुन्हा भीती व्यक्त करण्यात आली आहे.पहलगाम हल्ल्यानंतर भारत सोडण्याचे आदेश सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिल्यावर सहा दिवसांत वरून ७८६ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले.

यामध्ये ५५ राजनैतिक अधिकारी, त्यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि कर्मचारी, पाकिस्तानी व्हिसा असलेले आठ भारतीय यांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. तर दुसरीकडे १,४६५ भारतीय पाकिस्तानातून परतले. यामध्ये २५ राजनैतिक अधिकारी, अन्य अधिकारी, दीर्घकालीन भारतीय व्हिसा असलेले १५१ पाकिस्तानी भारतात परतले आहे.‘पाकच्या संरक्षणमंत्र्यांचा दावावृत्तसंस्था, इस्लामाबाद‘अनेक देशांनी भारत-पाकिस्तान या दोन शेजारी देशांमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न केले असले, तरी काळाबरोबर भारतासोबत संघर्षाची शक्यता वाढत आहे,’ अशी भूमिका पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी मांडली. आमचे प्रत्यत्तर भारताच्या कारवाईपेक्षा मोठे असेल,’ अशी दर्पोक्तीही त्यांनी केली. पाकिस्तानी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना आसिफ यांनी हे विधान केले. ‘भारताकडून उल्लंघन झाले, तर आम्ही प्रतिसाद देऊ, भारताच्या कारवाईवर आमच्या प्रत्युत्तराचे स्वरूप ठरेल’ असे ते म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.