हल्लेखोरांना कठोर शिक्षा देऊ; पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना सज्जड इशारा.

 दहशतवाद्यांनी तसेच, त्यांच्या सूत्रधारांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना देण्यात येईल,’ असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे दिला.पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांचा पृथ्वीच्या अंतापर्यंत पाठलाग केला जाईल व या दहशतवाद्यांनी तसेच, त्यांच्या सूत्रधारांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना देण्यात येईल,’ असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे दिला. पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रथमच पंतप्रधानांनी या घटनेवर भाष्य केले. पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय ग्रामविकास व पंचायतराजमंत्री राजीव रंजन या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी झालेल्या सभेच्या सुरुवातीस पंतप्रधानांनी उपस्थितांना दोन मिनिटे मौन राखून पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले.

‘या निघृण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांप्रति देशभरातील नागरिक सहवेदना व्यक्त करत आहेत. या मृतांच्या पाठीशी पूर्ण देश उभा आहे. या हल्ल्यात अनेकांनी आपली मुले, भाऊ, पती यांना गमावले. बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, बिहार अशा अनेक प्रांतांतील नागरिकांचा या मृतांमध्ये समावेश आहे. कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत आपले दुःख व आपला आक्रोश एकसारखाच आहे, असे ते म्हणाले.त्यानंतर त्यांनी पहलगामच्या घटनेवर भाष्य करताना दहशतवादी व पाकिस्तानला इशारा दिला. ‘बिहारच्या भूमीवरून मी आज सर्व जगाला सांगू इच्छितो की, या दहशतवादी हल्ल्यात सामील असणाऱ्यांची भारत ओळख पटवेल, त्यांचा माग काढला जाईल व त्यांना तसेच, त्यांच्या सूत्रधारांना शिक्षा करण्यात येईल. आम्ही या सर्वांचा पृथ्वीच्या अंतापर्यंत पाठलाग करू. भारताची देशभावना दहशतवादामुळे मोडून पडणार नाही. दहशतवादाला शिक्षा होईलच,’ असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, हा इशारा त्यांनी इंग्लिशमधून दिला.’हा हल्ला ज्यांनी घडवून आणला व हल्लेखोरांचे जे सूत्रधार आहेत त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना करण्यात येईल, हे मी स्पष्टपणे सांगत आहे,’ असे पंतप्रधानांनी पाकिस्तानचे नाव न घेता ठणकावले. हे भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांचे कंबरडे मोडेल,’ असेही ते म्हणाले.स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना ५० टक्के आरक्षण लागू करणारे बिहार हे पहिले राज्य ठरल्याबद्दल पंतप्रधानांनी नितीशकुमार यांचे अभिनंदन केले. ‘गेल्या १० वर्षांत साडेपाच लाखांहून अधिक सामान्य सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच, दोन लाख ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडण्यात आल्या आहेत,’ असेही पंतप्रधानांनी नमूद केले. या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.’या बळी पडलेल्यांना न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मुद्द्यावर संपूर्ण देश ठाम आहे. माणुसकीवर ज्यांचा-ज्यांचा विश्वास आहे, ते आमच्यासोबत आहेत. या हल्ल्यानंतर ज्या-ज्या देशांतील नेत्यांनी तसेच, तेथील नागरिकांनी भारताप्रति पाठिंबा व्यक्त केला, त्यांचे मी आभार मानतो, असेही ते म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.