पत्नीसोबतची सहल ठरली शेवटची, पनवेलच्या दिलीप देसलेंना अखेरचा निरोप, कुटुंबाचा हृदय हेलावणारा आक्रोश.

आम्ही कदाचित एक-दोन दिवस तेथे उशिरा पोहोचलो असतो किंवा तिथला मुक्काम काही काळ वाढविला असता, तर कुठली आपत्ती ओढावली असती… या कल्पनेने आमच्या काळजाचा अद्यापही ठोका चुकतो!’आम्ही दोन दिवस अगोदरच पहलगाम परिसरातून बाहेर पडलो. ज्या स्थळावर दहशतवाद्यांनी निष्पाप देशबांधवांची हत्या केली त्या परिसरातून आम्हालाही घोड्यावरून बैसरन या पर्यटनस्थळी जायचे होते. मात्र, आम्हा नाशिकच्या उभयतांसोबत जो सहा जणांचा ग्रुप होता तो पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांचा होता. त्यांना घोड्यावरून प्रवास करणे शक्य नव्हते. त्यामुळे इच्छा असूनही आम्ही तो बेत रद्द केला.कदाचित पुणेकरांनी बैसरनला जाण्याची तयारी दाखविली असती तर आमचा तेथील मुक्काम वाढला असता. तो बेत रहित झाला अन् आम्ही श्रीनगरच्या मार्गावर प्रवासात असतानाच या भीषण हल्ल्याची माहिती समजलीअन् आम्ही हादरलो. आम्ही कदाचित एखाद्-दोन दिवस तेथे उशिरा पोहोचलो असतो किंवा तिथला मुक्काम काही काळ वाढविला असता, तर कुठली आपत्ती ओढावली असती… या कल्पनेने आमच्या काळजाचा अद्यापही ठोका चुकतो!’ हे बोल आहेत नाशिकच्या गोळे कॉलनीतील व्यावसायिक शशिकांत नेर आणि त्यांच्या पत्नी मनीषा नेर यांचे. नेर दाम्पत्य या घटनेदरम्यान पहलगाम ते श्रीनगरदरम्यानच्या मार्गावर होते.एक दिवस अगोदरच त्यांनीपहलगामलाभेट दिली होती. श्रीनगरमध्ये सुरक्षित पोहोचल्यानंतर त्यांच्याशी फोनद्वारे झालेल्या संपर्कादरम्यान त्यांनी ‘मटा’शी बोलताना आपबीती सांगितली. पहलगाममधील घटनेचे वृत्त देशभरात पोहोचताच नातलगांकडून फोन सुरू झाले. आसपासचे वातावरण झपाट्याने बदलत होते. वातावरणात अस्वस्थता जाणवत होती. श्रीनगरमधील राजबाग येथील हॉटेल ग्रीन एकरमध्ये पोहोचताच टीव्हीवरील दृश्यांमुळे हल्ल्याची व्याप्ती समजली.

सुरक्षा यंत्रणांनी इंटरनेटही बंद केले होते. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी खासगी वाय-फाय उपलब्ध करून दिल्याने नातलगांपर्यंत आम्ही सुखरूप असल्याचे संदेश बराच वेळाने पोहोचवू शकलो, असेही नेर दाम्पत्याने सांगितले. मनमाडमधील आनंद दरगुडे ट्रॅव्हलच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांना घेऊन १८ एप्रिलला काश्मीरला गेले आहेत. सफर सुरू असताना मंगळवारी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ल्याचे वृत्त आले आणि अनामिक भीतीने सारेच हादरून गेले. घटना घडली तेव्हा ते गुलमर्गला होते. तेथून घटनास्थळ दूर असले, तरी घटनेचे गांभीर्य पाहता असुरक्षिततेचे वातावरण जाणवले. सर्वजण श्रीनगरमध्ये सुरक्षित पोहोचले. पण, ‘भय इथले संपत नाही’ अशी परिस्थिती होती. ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी त्यांना धीर दिला. सुरक्षित असण्याची ग्वाही दिली. त्यानंतर सफर पूर्ण करण्याचा सर्वांनीच केलेला निर्धार ही जमेची बाजू ठरली.जुलैत सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याने विशेष परिणाम होणार नसल्याचे पर्यटन व्यावसायिकांचे मत आहे. कारण, अमरनाथ यात्रेसाठी आगाऊ बुकिंग होत असल्याने सर्व चेकपॉइंटबावत सुरक्षा यंत्रणेस इत्थंभूत माहिती आहे. या हल्ल्यामुळे यंत्रणा या यात्रेत अधिक सतर्क असतील. या यात्रेत जाणारा वर्ग हा भाविक असल्याने तो देवावरच्या श्रद्धेपोटी व आत्मविश्वासाने यात्रेत सहभागी होतो, असा अनुभव ज्येष्ठ व्यावसायिकांनी सांगितला.नाशिकचे दुसरे पर्यटक अमोल पाटील व अबोली पाटील (पर्यटकांच्या विनंतीनुसार नाव बदलले आहे) हे दाम्पत्य काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. श्रीनगर येथे मंगळवारी पोहोचताच थोडावेळ आराम करून आम्ही निसर्ग बघण्यासाठी ट्युलिप गार्डन येथे गेलो. तेथे पोहोचत नाही तोच नाशिकहून कुटुंबीयांनी फोनद्वारे काश्मीरमध्ये असा हल्ला झाल्याचे कळविले.

हल्ल्याचे वृत्त समजताच आम्ही तातडीने हॉटेलमध्ये परतलो, तर हॉटेलच्या दाराशीच मोठ्ठा जमाव होता. गर्दीत डोकावून बघितले तर आतडे पिळवटून टाकणारा आक्रोश एक महिला करीत होती. या महिलेदेखत तिच्या पतीला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून मारले होते. हे भीषण दृश्य बघून आमच्या पायाखालची जमीन निघून गेल्यासारखे वाटले.काश्मीर परिसरातील हल्ल्यादरम्यान चिमुकल्या मुलांसह आणि महिलांसह अडकून पडलेल्या काही नाशिककर कुटुंबीयांनी जीव मुठीत धरून प्रवास सुरू ठेवला. या संदर्भातील एक व्हिडीओ पुण्यातील रुपाली ठोंबरे यांनी व्हायरल केला आहे. त्यांच्यासमवेत नाशिकचेदेखील कुटुंब होते. या कुटुंबासोबत लहान मुलेही होती. या कुटुंबीयांना काश्मीर परिसरातील त्यांच्या वाहनाचे स्थानिक चालक आदिलभाई यांनी स्वतःच्या घरी नेत सर्वांचा पाहुणचार केला. त्यांच्यासाठी व्यवस्थित जेवण बनवून अत्यंत सुरक्षितपणे त्यांच्या मुक्कामाच्या हॉटेलवर आणून सोडले. या नाशिककर पर्यटकांना निरोप देताना या काश्मिरी चालकाच्या डोळ्यात अश्रू तरळलेआमच्या कंपनीद्वारे सद्यस्थितीत ७५० पर्यटक काश्मीरला गेले आहेत. हे सर्व पर्यटक सुरक्षित असून, लवकरच नाशिकला येतील. स्थानिक प्रशासनाचेही सहकार्य मिळत आहे. त्यांच्या सर्व नातेवाइकांशी बोलून आम्ही त्यांची खुशाली कळविली आहे. त्यांना तिकीट बुकिंगपासून लागणारी सर्व मदत आम्ही देत आहोत.नाशिकमधून काश्मीरला गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. संघटनेच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या ग्राहक किंवा संपर्कातील यात्रेकरूंशी संपर्क साधून माहिती घेतली आहे. त्यांना आवश्यक ती मदत समन्वयातून मिळवून देण्यासाठी संघटना तत्पर आहे. – सागर वाकचौरे, अध्यक्ष, तानगेल्या पाच वर्षांपासून काश्मीरमध्ये पर्यटकांचा फूटफॉल वाढीस लागला होता. पण, या हल्ल्याने सर्व चित्रावर पाणी फिरविले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येऊन पुन्हा एकदा सुरक्षित काश्मीरची उभारणी होईल. काश्मीर दौऱ्यावरील सर्व ग्राहक-पर्यटक सुरक्षित आहेत

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.