बीड जिल्ह्यातील एका तरुणाने गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहिले आणि बायकोचे सोने मोडत गावकऱ्यांची तहान भागवली आहे. त्या तरुणाला आता गावकरी जलदूत म्हणत आहेत.बीड जिल्ह्यात उन्हाळ्यात शेतकऱ्यासह अनेक खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील लोकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. या पाण्यासाठी मैलोन मैल भटकंती करावे लागते यातच जरूड गाव आणि त्या बाजूचे पाच गाव हे नेहमीच होरपळताना पाहायला मिळतात. गावातल्या लोकांच्या घशाला कोरड पडली आहे आणि त्यांना मैलोन मैल जाऊन पाणी मिळत नाही, त्यात घरच्या प्रत्येकाच्या लक्ष्मीची पायपीट एका तरुणाला बघवली नाही. यासाठी त्याने थेट आपल्या बायकोचं सोनच मोडलं आणि बनला एका गावात सह पाच गावांचा जलदूत. राजेश काकडे हे या तरुणाचे नाव आहे.
राजेश काकडे बीड पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं जरूड गावचा हा रहिवासी. थोडाफार शिकलेला मात्र लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला गावची तहान भागवण्यासाठी यांना थेट आपल्या बायकोच्या अंगावरील सोनं विकून बोरवेल घेतला आणि या बोरवेलला इतकं पाणी लागलं की एका गावासह पाच गावाची ताण देखील या बोरवेलवर भागवली. मात्र कालांतराने या बोरचंही पाणी कमी पडू लागलं आणि त्यात त्याने अजून एक बोर घेऊन पंचक्रोशीतील गावांना पाणी द्यायचा संकल्प केला. या संकल्प मुळे उन्हाळ्यात आता जवळपास अनेक गावांची तहान भागते हा तरुण सध्या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात जलदूत म्हणून ओळखला जात आहे.राजेश स्वतःची बाजरी डाळिंब आणि मोसंबीचं पीक हे वाया जाऊ दिले. कारण पाणी गावाला देण्यासाठी त्यांनी शेताला पाणी दिलेच नाही.









