भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे; २२ एप्रिलपासून नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक प्रक्रिया सुरु होणार.

येत्या २२ एप्रिलपासून संघटन पर्वातील पुढच्या टप्प्यात नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे दिली.विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संघटनात्मक बदलावर आणि मजबुतीवर भर दिला आहे. त्यानुसार येत्या २२ एप्रिलपासून संघटन पर्वातील पुढच्या टप्प्यात नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे दिली.

या संघटन पर्वाचा आढावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष आणि मंडल अध्यक्षांच्या निवडीबाबत माहिती दिली.येत्या २० एप्रिल रोजी राज्यातील सर्व म्हणजे १ हजार १९६ मंडल अध्यक्षांची निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखीत होणार आहे. यावेळी तरुणांना अधिकाधिक संधी मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे. भाजपमध्ये पूर्णपणे लोकशाही पद्धत राबवून ही निवड प्रक्रिया होत असते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.दरम्यान, संघटन पर्वाअंतर्गत भाजपचे दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि १ लाख ३४ हजारांहून अधिक सक्रिय सदस्यांच्या नोंदणीचे विक्रमी उद्दिष्ट साध्य करून महाराष्ट्र भाजपचे सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरल्याचे अरुण सिंह यांनी यावेळी सांगितले.

पक्षाच्या ७० टक्के बूथ समित्यांचे गठन झाले असून २२ एप्रिलपर्यंत एक लाखापर्यंत बूथ समित्या स्थापण्याचे उद्दिष्ट आहे.सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी एका कंपनीकडून सात कोटी रुपयांना जमीन खरेदी केली. वाड्रा यांनी चार महिन्यात त्याच जमिनीची विक्री त्याच कंपनीला ५८ कोटी रुपयांना केली. चार महिन्यांत जमिनीची किंमत एवढी वाढवणारा व्यवहार केल्यावर त्याची चौकशी होणारच, असे सिंह य सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.