पाकव्याप्त काश्मीर सोडून द्या! भारताने पाकिस्तानला ठणकावले, लष्करप्रमुखांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर.

 काश्मीर ही पाकिस्तानची धमनी आहे आणि कोणीही त्याला पाकिस्तानपासून वेगळे करू शकणार नाही,’ अशी मुक्ताफळे इस्लामाबादमध्ये अनिवासी पाकिस्तानी नागरिकांच्या कार्यक्रमात जनरल मुनीर यांनी उधळली होती.‘जम्मू आणि काश्मीरचा पाकिस्तानशी एकच संबंध आहे… तो म्हणजे पाकिस्तानने बेकायदा ताब्यात घेतलेला भूभाग सोडून द्यावा,’ अशा शब्दांत भारताने गुरुवारी पाकिस्तानला ठणकावले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.‘काश्मीर ही पाकिस्तानची धमनी आहे आणि कोणीही त्याला पाकिस्तानपासून वेगळे करू शकणार नाही,’ अशी मुक्ताफळे इस्लामाबादमध्ये अनिवासी पाकिस्तानी नागरिकांच्या कार्यक्रमात जनरल मुनीर यांनी उधळली होती.त्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘धमनीमध्ये परकीय गोष्ट कशी असेल? काश्मीर हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. पाकिस्तानशी त्याचा एकच संबंध आहे… त्यांनी बेकायदा ताब्यात घेतलेला भूभाग सोडून द्यावा.’२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्याबाबत पाकिस्तान जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे, यावरही जयस्वाल यांनी पाकिस्तानला सुनावले.

ते म्हणाले, ‘पाकिस्तानने कितीही प्रयत्न केला, तरीही दहशतवादाचा केंद्रबिंदू म्हणून पाकिस्तानची ओळख कमी होणार नाही. पाकिस्तानने अजूनही लपवून ठेवलेल्या मुंबई हल्ल्यातील इतर आरोपींना न्यायासमोर आणणे गरजेचे आहे, हाच इशारा राणाच्या प्रत्यार्पणामुळे पाकिस्तानला मिळाला आहे, असेही जयस्वाल म्हणाले.पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अनिवासी समुदायासाठी आयोजित एका कार्यक्रमात काश्मीरला पाकिस्तानची धमनी (गळ्याची शिर) असे वर्णन केले. आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना त्यांच्या संघर्षात एकटे सोडणार नाही, असे ते म्हणाले होते. तसेच परदेशातील पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मुलांना देशाची कहाणी सांगण्याचे आवाहन केले. जीवनाच्या प्रत्येक पैलूत हिंदू आणि मुस्लिम वेगळे आहेत, असा आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता, असे मुनीर म्हणाले होते.

या कार्यक्रमाला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, वरिष्ठ मंत्री आणि अनिवासी पाकिस्तानी नागरिक उपस्थित होते. ‘पाकिस्तानची निर्मिती ज्या मूल्यांसाठी आणि दृष्टिकोनासाठी करण्यात आली होती, ती जपावे आणि त्यांची कहाणी त्यांच्या मुलांना सांगावी,’ असे आवाहन मुनीर यांनी अनिवासी समुदायाला केले.जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश देशाचा अविभाज्य भाग होते, आहेत आणि नेहमीच राहतील, असे भारताने पाकिस्तानला वारंवार सांगितले आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताने राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर, जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.