दहा वर्षांपूर्वी ताराचंद याचे ज्योती यांच्यासोबत लग्न झाले. त्यांच्यात खटके उडायला लागले. दीड महिन्यापूर्वी ज्योती या माहेरी गेल्या.पत्नीच्या विहरामुळे तो तणावात राहायला लागला. पत्नीला परत पाठवा अशी विनवणी तो सासरच्यांना करायला लागला. विनवणी करतानाचा युवकाचा मेहुण्यासोबत वाद झाला. वाद विकोपाला गेला अन् मेहुण्याने जावायला संपविले. ही थरारक घटना नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कळमना गावात घडली.
ताराचंद शिवचरण प्रजापती (वय 35, रा. गोकुलनगर, कळमना) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी मेहुण्याला अटक केली. राहुल दिलीप इंगळे (वय 24) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
दहा वर्षांपूर्वी ताराचंद याचे ज्योती यांच्यासोबत लग्न झाले. त्यांच्यात खटके उडायला लागले. दीड महिन्यापूर्वी ज्योती या माहेरी गेल्या. पत्नीच्या विरहात ताराचंद तणावात राहायला लागले.










