“ह्यांचा व्यासपीठावर बसलेल्या लोकांवरपण विश्वास नाही” निर्धार मेळाव्यावरुन उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात.

आर्टिफिशल इंटेलिजन्स द्वारा साहेबांच्या आवाजात काल भाषण झालं त्यात शिंदेंवर, देवेंद्रजींवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर एक कलमी टीका झाली. मला असं वाटतं की जसं काँग्रेस बरोबर जाऊन अनैसर्गिक युती झाली तसं, अनैसर्गिक भाषण दाखवून काही महाराष्ट्राच्या जनतेला परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात बाळासाहेबांची प्रतिमा आहे. अशा शब्दात उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याची बाळासाहेबांच्या आवाजातील AI भाषणाची हजेरी घेतली आहे.उद्धव ठाकरे यांच्या नाशिक येथील निर्धार मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. “एका भाषणात चंद्रकांत खैरे तर दुसऱ्या भाषणात बबनराव घोलप यांचे नाव आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांचा व्यासपीठावर बसलेल्या लोकांवरच विश्वास नाही.

त्यांनी दुसऱ्या पक्षावर का टीका करायची?” असा सवाल करत उदय सामंत यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “त्यांच्याकडच्या नेत्यांना टिकवण्यासाठी शिंदेंवरती टीका करणं हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम” असल्याचंही उदय सामंत म्हणाले.ते पुढे म्हणाले की,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की, “माझी शिवसेना जेव्हा काँग्रेस बरोबर जाईल त्या वेळेला मी शिवसेनेचे दुकान बंद करीन”. आम्हाला खरंतर हे काल उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचं होतं की बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जर पुढे न्यायचा असेल तर ते ज्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत त्या काँग्रेसला आम्ही सोडलं या विचारांचा निर्धार काल होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं.

पण आर्टिफिशल इंटेलिजन्स द्वारा साहेबांच्या आवाजात काल भाषण झालं त्यात शिंदेंवर, देवेंद्रजींवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर एक कलमी टीका झाली. मला असं वाटतं की जसं काँग्रेस बरोबर जाऊन अनैसर्गिक युती झाली तसं, अनैसर्गिक भाषण दाखवून काही महाराष्ट्राच्या जनतेला परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात बाळासाहेबांची प्रतिमा आहे. अशा शब्दात उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याची बाळासाहेबांच्या आवाजातील AI भाषणाची हजेरी घेतली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम शिंदे साहेब करत आहेत. आणि त्यामध्ये 80 जागा लढून आम्ही 60 ठिकाणी जिंकलो आहोत. त्यामुळे आम्ही शिक्कामोर्तब करून दाखवला आहे की वंदनीय बाळासाहेब यांचे विचार पुढे नेणारी शिवसेना ही धनुष्यबाणाची आहे. आणि त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता असलेली संघटना टिकवणे, असलेले आमदार स्वतःकडे काहीतरी मॉरल सपोर्ट देऊन थांबवणे, त्याच्यासाठी केलेला तो निर्धार मेळावा होता अशा शब्दांत सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.