पान टपरीवर वाद विकोपाला गेला आणि नको ते घडलं; नागपुरातील घटनेने खळबळ.

नागपुरात पान टपरीवर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि हत्येची घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्यभरात हत्येच्या, चोरी, मारामारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. उपराजधानी असलेल्या नागपुरातही हत्येच्या घटना सतत समोर येत आहेत. आतापर्यंत अनेकांना या गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. उपराजधानीत हत्येचे सत्र सुरूच असून, पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरीनगर परिसरात कुख्यात गुन्हेगाराचा खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.जितेंद्र ऊर्फ जितू राजू जयदेव वय ४० रा. भीम चौक, असं मृतकाचं नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी इतवारीदास शिवदास माणिकपुरी वय ३५ रा. नवीननगर याला अटक केली आहे.

जितूविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. इतवारीदासविरोधात घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत.इतवारीदासचा मोबाइल चोरी गेला. जितू याने मोबाइल चोरी केल्याचा संशय त्याला आला. सोमवारी सायंकाळी इतवारीदास हा हिवरीनगरमधील पान ठेल्यावर गेला. येथे जितू उभा होता. इतवारीदास याने जितूकडे मोबाइलबाबत विचारणा केली. माझ्याकडे मोबाइल नाही, असं जितू त्याला म्हणाला. यावरुनच दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला.

वादादरम्यान जितूने इतवारीदासच्या कानशिलात लगावली. इतवारीदास संतापला. त्याने काठीने जितूच्या डोक्यावर वार केले. तिथेच घटनास्थळीच जितूचा मृत्यू झाला. जितूवर हल्ला करुन, त्याला ठार केल्यानंतर इतवारीदास घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी जितूचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीचा शोध घेऊन इतवारीदास याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Related Posts

    रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?

    रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’सिनेमाच्या शूटींगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाल्याची माहिती समोर आलीये. अभिनेता रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’सिनेमाच्या शूटींगवेळी दुर्घटना घडलीये.साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी सिनेमाचं शूटींग सुरु असताना एक दुर्घटना…

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?

    रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

    पुढील 72 तास महत्त्वाचे, पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व दौरे रद्द, दहशतवाद्यांचा होणार खात्मा.

    पुढील 72 तास महत्त्वाचे, पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व दौरे रद्द, दहशतवाद्यांचा होणार खात्मा.

    आईचा फोन, संजयला गोळी लागलीय… डोंबिवलीतील आत्ते-मामे भावंडांवर पहलगाममध्ये तिहेरी घाला.

    आईचा फोन, संजयला गोळी लागलीय… डोंबिवलीतील आत्ते-मामे भावंडांवर पहलगाममध्ये तिहेरी घाला.