महाराजांचा अपमान आता बस्सsss! रायगडावर फडणवीसांसमोरच उदयनराजेंच्या शाहांकडे पाच प्रमुख मागण्या, अरबी समुद्र, सेन्सर बोर्ड अन्…

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी रायगडावर महाराजांना अभिवादन केले. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, खासदार उदयनराजे भोसले, खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आदिती तटकरे, मंत्री आशिष शेलार, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान आपल्या भाषणामध्ये उदयनराजेंनी पाच मागण्या केल्या. नेमक्या कोणत्या जाणून घ्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा विचार दिला होता. एकमेव असा राजा, युगपुरूष होऊन गेला. ज्याने नेहमी लोकांसाठी आयुष्य वेचलं. हा संपूर्ण विचार घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण लोकशाही पाहतोय त्या काळात जो विचार दिला होता की लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे याचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला त्यांचा अवमान केला जातो.

या घटना वाढताना दित आहेत. त्यामुळे या ठिकाणी मी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना मी चार ते पाच मागण्या करणार आहे. तो कायदा ज्यामध्ये बेल नसणार आणि दहा वर्षे कारागृहाची शिक्षा असणार आहे. संपूर्ण शासनमान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि तेढ निर्माण होऊ नये, असं उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी म्हटलं आहे.सिनेमॅटिक लिबर्टीच्याबाबतीत सेन्सॉर बोर्डची स्थापना करण्यात यावी. जेणेकरून एखादा स्वत:च्या कल्पनेतून एखादी कांदबरी लिहितो आणि त्याला ऐतिहासिक पुरावे नसतात. त्यामुळे अलिकडच्या काळात छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केली.

मी मागेच अमित शहा आणि देवेंद्रजींकडे मागणी केली होती. जसं रामायण सर्किट आणि बुद्ध सर्किट स्थापना करण्यात आली तशा प्रकारे शिवस्वराज्य सर्किट करण्यात यावं, याची कालच शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे ही शिवभक्ताची मागणी आहे. तो काळ आठवा ज्यावेळेस या ठिकाणी निजामशाही आणि मुघलशाही होती. अशा परिस्थितीत शहाजी महाराजांच्या मनात जो स्वराज्याचा विचार होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी उतरवला. त्यामुळे शहाजी महाराजांची होतगिरीला दावणगिरी जिल्ह्यामध्ये समाधी आहे. ती देखरेखाली असली तरी त्याला केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, असं उदयनराजे भोसले म्हणाले.अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. कदाचित त्या ठिकाणी पर्यावरणीय समस्या असतील, मी देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घातलं आहे. दिल्लीमध्ये तर झालंच पाहिजे पण महाराष्ट्रात देखील झालं पाहिजे. गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी ४८ एकर जागा समुद्राला लागून आहे त्या ठिकाणी स्मारत व्हावं अशी अनेकांची मागणी आहे. स्मारक बनवतो याचे मूळ उद्दिष्ट असे असते की भावी पीढीला यातून चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल आणि देशाची प्रगती होईल, याची घोषणा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी करावी. या मागण्या पूर्ण झाल्या तर देशाला आनंद होईल, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.