छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी रायगडावर महाराजांना अभिवादन केले. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, खासदार उदयनराजे भोसले, खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आदिती तटकरे, मंत्री आशिष शेलार, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान आपल्या भाषणामध्ये उदयनराजेंनी पाच मागण्या केल्या. नेमक्या कोणत्या जाणून घ्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा विचार दिला होता. एकमेव असा राजा, युगपुरूष होऊन गेला. ज्याने नेहमी लोकांसाठी आयुष्य वेचलं. हा संपूर्ण विचार घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण लोकशाही पाहतोय त्या काळात जो विचार दिला होता की लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे याचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला त्यांचा अवमान केला जातो.










