महाराजांचा अपमान आता बस्सsss! रायगडावर फडणवीसांसमोरच उदयनराजेंच्या शाहांकडे पाच प्रमुख मागण्या, अरबी समुद्र, सेन्सर बोर्ड अन्…

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी रायगडावर महाराजांना अभिवादन केले. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, खासदार उदयनराजे भोसले, खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आदिती तटकरे, मंत्री आशिष शेलार, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान आपल्या भाषणामध्ये उदयनराजेंनी पाच मागण्या केल्या. नेमक्या कोणत्या जाणून घ्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा विचार दिला होता. एकमेव असा राजा, युगपुरूष होऊन गेला. ज्याने नेहमी लोकांसाठी आयुष्य वेचलं. हा संपूर्ण विचार घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण लोकशाही पाहतोय त्या काळात जो विचार दिला होता की लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे याचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला त्यांचा अवमान केला जातो.

या घटना वाढताना दित आहेत. त्यामुळे या ठिकाणी मी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना मी चार ते पाच मागण्या करणार आहे. तो कायदा ज्यामध्ये बेल नसणार आणि दहा वर्षे कारागृहाची शिक्षा असणार आहे. संपूर्ण शासनमान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि तेढ निर्माण होऊ नये, असं उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी म्हटलं आहे.सिनेमॅटिक लिबर्टीच्याबाबतीत सेन्सॉर बोर्डची स्थापना करण्यात यावी. जेणेकरून एखादा स्वत:च्या कल्पनेतून एखादी कांदबरी लिहितो आणि त्याला ऐतिहासिक पुरावे नसतात. त्यामुळे अलिकडच्या काळात छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केली.

मी मागेच अमित शहा आणि देवेंद्रजींकडे मागणी केली होती. जसं रामायण सर्किट आणि बुद्ध सर्किट स्थापना करण्यात आली तशा प्रकारे शिवस्वराज्य सर्किट करण्यात यावं, याची कालच शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे ही शिवभक्ताची मागणी आहे. तो काळ आठवा ज्यावेळेस या ठिकाणी निजामशाही आणि मुघलशाही होती. अशा परिस्थितीत शहाजी महाराजांच्या मनात जो स्वराज्याचा विचार होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी उतरवला. त्यामुळे शहाजी महाराजांची होतगिरीला दावणगिरी जिल्ह्यामध्ये समाधी आहे. ती देखरेखाली असली तरी त्याला केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, असं उदयनराजे भोसले म्हणाले.अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. कदाचित त्या ठिकाणी पर्यावरणीय समस्या असतील, मी देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घातलं आहे. दिल्लीमध्ये तर झालंच पाहिजे पण महाराष्ट्रात देखील झालं पाहिजे. गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी ४८ एकर जागा समुद्राला लागून आहे त्या ठिकाणी स्मारत व्हावं अशी अनेकांची मागणी आहे. स्मारक बनवतो याचे मूळ उद्दिष्ट असे असते की भावी पीढीला यातून चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल आणि देशाची प्रगती होईल, याची घोषणा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी करावी. या मागण्या पूर्ण झाल्या तर देशाला आनंद होईल, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

  • Related Posts

    वेगात झाडावर आदळली अन् दुचाकी जळून खाक, दोन सख्ख्या भावांचा एकत्र अंत, कुटुंबाचा आक्रोश.

    भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी थेट झाडाला आदळली. या घटनेत दोन सख्ख्या भावांसह तिघांनी आपला जीव गमावला आहे.भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला आदळून दोन…

    काँग्रेसला मोठा धक्का! भोरच्या संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित, अमित शांहाची भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती.

    पुण्यातील भोर मतदारसंघावर संग्राम थोपटे यांची मजबूत पकड असून त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे देखील सहा वेळा आमदार होते.  राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वेगात झाडावर आदळली अन् दुचाकी जळून खाक, दोन सख्ख्या भावांचा एकत्र अंत, कुटुंबाचा आक्रोश.

    वेगात झाडावर आदळली अन् दुचाकी जळून खाक, दोन सख्ख्या भावांचा एकत्र अंत, कुटुंबाचा आक्रोश.

    काँग्रेसला मोठा धक्का! भोरच्या संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित, अमित शांहाची भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती.

    काँग्रेसला मोठा धक्का! भोरच्या संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश निश्चित, अमित शांहाची भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती.

    सोलापुरात भाजपचे दोन आमदार आमने-सामने ,कल्याणशेट्टींना शह देण्यासाठी सुभाषबापूंची फिल्डिंग, पवारांचा जुना मोहरा हेरला.

    सोलापुरात भाजपचे दोन आमदार आमने-सामने ,कल्याणशेट्टींना शह देण्यासाठी सुभाषबापूंची फिल्डिंग, पवारांचा जुना मोहरा हेरला.

    लग्नातला भामटा… फेटा बांधून नातेवाईक बनून मिरवायचा, दागिने चोरायचा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात.

    लग्नातला भामटा… फेटा बांधून नातेवाईक बनून मिरवायचा, दागिने चोरायचा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात.