‘मी पत्नी, मुलगी आणि भाचीला संपवलं…’ रक्ताने माखलेला चाकू घेऊन होमगार्ड पोलीस ठाण्यात पोहोचला

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या होमगार्डने आपली पत्नी, मुलगी आणि भाचीची हत्या केली आणि चाकू घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. येथील पेन्या पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास एक व्यक्ती रक्ताने माखलेला चाकू घेऊन पोहोचला. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच त्याने सांगितले की, मी नुकतीच पत्नी, मुलगी आणि भाचीची हत्या केली आहे. आता मी तुम्हाला शरण येत आहे. हे ऐकून तेथे उपस्थित सारे पोलिसही चक्रावले. पोलिसांनी तात्काळ त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याची चौकशी केली. आरोपीने स्वत:च्या गुन्ह्याची देत संपूर्ण घटना सांगितली. त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिला मारुन टाकले. मुलगी व भाचीने त्याला अडवले असता त्याने त्यांचीही हत्या केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, गंगाराजू हा मूळचा नेलमंगला येथील रहिवासी आहे. ४० वर्षीय गंगाराजू हा बंगळुरू अर्बनमधील हेब्बागोडी पोलिस स्टेशनमध्ये होमगार्ड म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी भाग्या आणि मुलगी नव्या व्यतिरिक्त भाग्याच्या बहिणीची मुलगी हेमावती देखील त्यांच्या जलाहल्लीतील चोक्कसंद्र येथे वास्तव्यास होते. त्यांचे कुटुंब गेल्या ६ वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत होते. भाग्या ही गृहिणी होती तर १९ वर्षांची नव्या एका खाजगी महाविद्यालयात पदवी शिक्षणाच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. पतीकडून घटस्फोट घेतल्यानंतर हेमावती मावशीकडे राहत होती.पोलिसांना दिलेल्या कबुलीत गंगाराजूने सांगितले की, त्याची पत्नी भाग्य (३८ वर्षे) हिचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे घरात रोज खटके उडत होते. या भांडणात दोन्ही बहिणी भाग्याला साथ देत होत्या, त्यामुळे गंगाराजू निराश झाला होता. बुधवारी दुपारीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर त्याने पत्नीवर चाकूने हल्ला केला. दोन्ही मुलींनी त्याला रोखले असता त्याने रागाच्या भरात त्यांच्यावरही हल्ला केला. तिघांची हत्या झाल्यानंतर आरोपीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून आपल्याला आत्मसमर्पण करायचे असल्याचे सांगितले.अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार यांनी याप्रकरणी सांगितले की, आरोपी गंगाराजूच्या आत्मसमर्पणानंतर पोलिसांचे पथक त्याच्या चोक्कसांद्रा, जलाहल्ली येथील घरात पोहोचले आणि तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा असून गळा चिरला होता. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने आता आयपीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू आहे.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.