जयपूर आगीत 14 जणांचा मृत्यू, 80 जखमींवर उपचार सुरू

जयपुरमध्ये एका सीएनजी टँकरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. ज्यात 14 जणांचा मृत्यू झाला आणि 80 हून अधिक जखमी झाले. 40 पेक्षा जास्त वाहने जळून खाक झाली. काही मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.  जयपूर येथे 20 डिसेंबर रोजी आगीची मोठी भीषण घटना घडली. सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका जास्त भयंकर होता की, 14 लोकांचा मृत्यू झाला आणि आजुबाजूच्या तब्बल 40 पेक्षा जास्त गाड्यांचे नुकसान झाले. या आगीत 80 पेक्षा अधिक लोक जखमी झाले तर 30 लोकांची स्थिर गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यास बराच वेळ लागला. या आगीच्या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या भीषण अपघातात अनेक मृतांचे मृतदेह इतके जळाले आहेत की, त्यांची ओळखही पटत नाहीये. अशा मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाच मृतांचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. या आगीच्या घटनेत एक बस जळून खाक झालीये. या बसबद्दलची मोठी माहिती पुढे येताना दिसतंय. या बसचे परमिट हे 16 महिन्यांपूर्वीच संपले होते. आगीच्या घटनेचा तपास केला जातोय. या प्रकरणी काही मोठे खुलासे हे केले जाऊ शकतात. आगीच्या घटनेने लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण हे बघायला मिळतंय. आग इतकी जास्त भीषण होती की, आगीच्या ज्वाला दूरपर्यंत दिसत होत्या. आगीनंतर रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या. आगीत जळून खाक झालेली वाहने पोलिसांकडून क्रेनच्या मदतीने इतर ठिकाणी हलवण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी अजमेर रोडवरील पूर्ण वाहतूक थांबवली होती. अजमेर रोडवर ज्याठिकाणी ही घटना घडली, त्याच्या थोड्याच अंतरावर एक पेट्रोल पंप होता. सुदैवाने ही आग तिथपर्यंत गेली नाही. मात्र, अचानक सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरला आग नेमकी कशी लागली, याबद्दल अजून काही खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला नाहीये. दोषींचे गय केली जाणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट करण्यात आलंय.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.