बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप

मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री 8.30 वाजता एक भीषण अपघात झाला. बेस्टच्या बसने रस्त्यावरील अनेक लोकांना चिरडले. 7 जणांचा मृत्यू. कुर्ला परिसरातील लालबहादूर शास्त्री रोडवर (एलबीएस रोड) झालेल्या अपघाताच्या मुद्द्यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. या अपघातासाठी कारणीभूत असलेला बसचालक संजय मोरे हा कंत्राटी तत्त्वावर काम करत होता. बेस्टमधील या कंत्राटी कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे बेस्टच्या अधिकाऱ्यांनाही काहीही करणे शक्य नसल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी केला. बेस्ट प्रशासन सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत आहे. ज्या कंपनीला बेस्टकडून (BEST Bus) कंत्राट देण्यात आले आहे, त्यांचे स्वत:चे ऑफिसही मुंबईत नाही. ते एका कंटेनरमध्ये बसतात. कालच्या अपघातामधील जो चालक नियुक्त करण्यात आला होता, त्याच्यावर बेस्ट प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. बेस्टच्या अधिकाऱ्यांना या कंपनीला जाब विचारायचा असेल तर हैदराबादला फोन करावा लागतो. तिकडेही कोणीही उत्तर द्यायला तयार नाही. मग बेस्टमध्ये या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना का घेतले जाते हैदराबादच्या या कंपनीवर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, ज्याच्यामुळे बेस्टमध्ये ही कंपनी चालते, असा सवाल सुनील प्रभू यांनी उपस्थित केला.

ज्या कंत्राटी कंपनीचे कर्मचारी बेस्टसाठी पुरवले जातात, त्यांच्या बसेस बेस्टपेक्षा जास्त आहेत. त्यांची जबाबदारी अधिक आहे. ड्रायव्हिंगसाठी बेस्टमध्ये लागणारा सर्व गोष्टीचा पालन होत आहे का? बस चालवण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या ड्रायव्हर्सवर बेस्टचा कंट्रोल का नाही? तो माणूस दारू पितो का त्याची चेकिंग होते का? त्याची मेडिकल चेकअप होते का, असा सवाल सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. कालच्या अपघाताची घटना ही दुर्दैवी आहे. आज मुख्यमंत्र्यांनी लोकांचा नातेवाईकांना मदत जाहीर केली. परंतु यावर थांबून फायदा नाही.  ही जी कंपनी आहे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्यावर बेस्ट प्रशासनाचा कोणताही कंट्रोल नव्हता, असेही प्रभू यांनी म्हटले.  मुंबईत अनेक गल्लीबोळ आणि झोपड्यांचा परिसर आहे. याठिकाणी बेस्ट प्रशासनाने मिनी बसची सेवा सुरु केली होती. या भागात राहणाऱ्या लोकांना रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणे परवडत नाही. पण सहा महिन्यांपूर्वी या मिनी बसेस बंद करण्यात आल्या. आता मोठ्या आकाराच्या इलेक्ट्रिक बसेसमुळे लहान रस्ते असणाऱ्या भागात वाहतूक कोंडी होत आहे, असेही सुनील प्रभू यांनी म्हटले कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघाताबाबत आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो.सदर अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या चार नागरिकांचा नाहक बळी गेला असून तो आकडा वाढण्याची शक्यता आहे. 35 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बेस्ट बसचा असा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. आणि बेस्ट प्रशासनाला व जनप्रतिनिधींना अंतर्मुख करून विचार करायला लावणार आहे असे वाटते.

आजमितीस बेस्ट ताफ्यातील 3000 बेस्ट बसेसपैकी 2000 बेस्ट बसेस या भाडेकरार तत्त्वावर वेट लिजवर चालविण्यात येतात. या भाडेकरार तत्त्वावर बसेस चा पुरवठा करणारा कंत्राटदारच सदर बससाठी चालक आणि वाहक यांची व्यवस्था करतो. बऱ्याच वेळा असे लक्षात आले आहे की कंत्राट दराने नेमलेले बस  चालक हे नवीन असतात. आणि त्यामुळे त्यांना  रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी बसेस चालवताना अडचण येते.त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या वर्षभरात सुमारे आठ नागरिकांनी बेस्टच्या   अपघातात जीव गमवाला आहे हे बाब अत्यंत गंभीर आहे. याची सखोल चौकशी करून सदर घटनांसंदर्भात जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ  एका वाहन चालकावर कारवाई करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पक्ष ते सहन करणार नाही असा इशारा आम्ही आपणास या पत्राद्वारे देत आहोत. 

कालच्या बेस्ट अपघातात बेस्ट चालक व कंत्राटदार यांच्या चुकीमुळे ज्यांचे नाहक बळी गेलेत अशा मृत नागरिकांच्या नातेवाईकांना आपण तातडीने दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि जखमी नागरिकांवरील उपचाराची संपूर्ण जबाबदारी व खर्च बेस्ट प्रशासनाने उचलावा; तसेच जखमी नागरिकांना रुपये 50 हजार ते दोन लाख पर्यंत झालेल्या जखमेच्या प्रमाणात तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे करित आहोत.बेस्टमध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष 2018 ते 2021 या काळात तत्कालीन सत्ताधारी उबाठा सेनेच्या नेतृत्वात आणि उबाठा सेनेचे युवराज श्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार  देण्यात आले होते. त्यावेळी भाजपाने सदर पस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता वाढणाऱ्या अपघातामुळे आणि झालेल्या जीवितहानीमुळे सदर बाबीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. तरी बेस्ट महाव्यवस्थापक म्हणून आपण याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा आणी मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना तातडीने मदत करावी तसेच दोषीवर कडक कारवाई करावी ही विनंती, असे प्रभाकर शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे. 

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.