राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक वेळेला हात मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीही ‘हो’ म्हटले नाही, असाही टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे त्यावेळेला माझ्याकडे असं म्हटले होते ‘एक म्यान मे दो तलवार नही रहती है’ मला अजून आठवतंय हे वाक्य. असाही गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रामदास कदम यांनी राज- उद्धव यांच्या एकत्र येण्यावरती मत व्यक्त केलं आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर आता महायुतीकडून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांनीही मोठी प्रतिक्रिया दिली असून “हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत असं मला पूर्वीही वाटत होतं आणि आताही वाटत आहे” असं सांगत “राज ठाकरे जर का शिवसेनेचे अध्यक्ष असते तर शिवसेना फुटली नसती” असेही मोठे विधान रामदास भाई कदम यांनी केलं आहे.
ते पुढे म्हणाले की हे दोघेही एकाच व्यासपीठावरती एकाच ठिकाणी येणार असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी मराठी माणसाचे हित आहे. हे दोघेही एकत्र आले पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत कालही होतं आणि आजही आहे. खरंतर मी आणि बाळा नांदगावकर आम्ही दोघांनीही यासाठी खूप प्रयत्न केले होते. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक वेळेला हात मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीही ‘हो’ म्हटले नाही, असाही टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे त्यावेळेला माझ्याकडे असं म्हटले होते ‘एक म्यान मे दो तलवार नही रहती है’ मला अजून आठवतंय हे वाक्य. असाही गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रामदास कदम यांनी राज- उद्धव यांच्या एकत्र येण्यावरती मत व्यक्त केलं आहे.राज ठाकरे यांची त्यावेळेला फक्त एकच मागणी होती की, पुणे आणि नाशिक हे फक्त दोन जिल्हे माझ्याकडे द्या बाकी उद्धव यांनी सगळं सांभाळावं.









