महाजनांचा विश्वासू असल्याचं सांगितलं, नोकरीचं नियुक्तीपत्रही दिलं अन् 2800000 रुपयांचा गंडा.

सरकारी नोकरीसाठी अनेक जण धडपड करत असलेल्या दोन भावांना लाखोंचा गंडा घातला. महाजन यांचे विश्वासू चालक असल्याचे सांगून दोन भावंडांना नोकरी लावून देण्याच्या नावावर २८ लाख ५० हजारांनी फसवणूक करण्यात आली.सरकारी नोकरीसाठी अनेक जण धडपड करत असतात मात्र काही लोक हे चुकीच्या लोकांच्या जाळ्यात अडकतात आणि त्यामुळे नोकरी तर मिळत नाही पण स्वत:च लाखोंच नुकसान करून घेतात. नोकरी देतो सांगून लुबाडणाऱ्याची टोळी कोणत्याही मोठ्या व्यक्तीची ओळख सांगते अन् गरजूला ते खरं वाटतं मात्र ज्यावेळी सत्य समोर येते त्यावेळी त्या व्यक्तीने समोरच्याला लाखों रुपये दिलले असतात. असाच प्रकार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेत एक टोळीने दोन भावांसोबत केला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू चालक असल्याचे सांगून दोन भावंडांना नोकरी लावून देण्याच्या नावावर २८ लाख ५० हजारांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांवर गुन्हे नोंदवले.

संदीप तुळशीराम आडे (३२), नीलेश साहेबराव राठोड (३५, दोघेही रा. बोरनगर, पुसद), रिधीर भिका राठोड (३८), लता रिधीर जाधव (३५, दोघेही रा. कुलाबा, मुंबई), रितेश उत्तम पवार (३२ रा. मुंबई) अशी आरोपींची नावे आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भागात असलेल्या हनवतखेडा येथील अंकुश प्रेमदास चव्हाण व सुमित परसराम चव्हाण हे दोघे चुलत भाऊ नोकरीच्या शोधात होते. त्याची माहिती संदीप राठोड व नीलेश राठोड यांना समजल्यावर त्यांनी ‘तुम्हाला नोकरी लावून देतो’ असे सांगितले. विश्वास बसण्यासाठी त्यांनी रिधीर जाधव व त्यांची पत्नी लता जाधव यांच्याशी मोबाइलवर बोलणे करून दिले.

रिधीर याने आपण मंत्री गिरीश महाजन यांच्या कारचा चालक असल्याचे सांगितले. यापूर्वी बऱ्याच जणांना नोकऱ्या लावून दिल्याचे त्याने सांगितले. रेल्वेत नोकरी मिळविण्यासाठी आधी अ‍ॅडव्हान्स द्यावा लागेल, असे सांगून अंकुशकडून साडेतेरा लाख, तर सुमितकडून १५ लाखांची मागणी केली.नोकरीच्या आमिषाने त्यांनी संबंधितांच्या खात्यावर २८ लाख ५० हजार रुपये टाकले. २८ फेब्रुवारीला दोघांनाही मुंबईत रूजू होण्यासाठीचे पत्र मिळाले. यानुसार रूजू होण्यासाठी गेले असता त्यांच्यासारखे नियुक्तीपत्र घेऊन आलेले काही लोक दिसले. तीन महिने वाट पाहूनही नियुक्ती न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली.

  • Related Posts

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाकिस्तानने त्यांची राजधानी वाचवण्यासाठी पावले उचलली असून लाहोर ते इस्लामाबाद या क्षेत्रात विमानांना उड्डाणबंदी घालण्यात आली आहे.  पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम…

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

     पंतप्रधान मोदींकडे  प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी आपल्याच देशाला सतर्कता बाळगण्याची सूचना केलीय.जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…