ठाकरेंच्या शिवसेनेतेली वाद विकोपाला, चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे, दोन मोठ्या नेत्यांमध्ये संघर्ष.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. खैरे यांनी आपण दानवे यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुरु असलेली धुसफूस अद्यापही कायम आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात एकाच पक्षात शितयुद्ध रंगलं आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्याकडून वारंवार एकत्र मिळून काम करण्याचं आवाहन केलं जात आहे. खैरे यांच्याकडून प्रचंड पोटतिडकीने एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन केलं जात आहे. खैरे यांनी आजदेखील पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. ठाकरे गटाचा नुकताच मेळावा पार पडला. या मेळव्यात खैरेंनी दांडी मारली. याबाबतही खैरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“मी मेळाव्याला दांडी मारली हे म्हणणं अतिउत्साहांचं आहे. माझा 2 महिन्यांपासून ठरलेला नागपूरमध्ये कार्यक्रम होता. तिकडे गेलो होतो. मला पक्षाच्या कालच्या कार्यक्रमाबाबत कुणी सांगितलं नव्हतं. मला कार्यकर्त्यांसोबत बोलायचं होतं. मात्र मी नसताना यांनी कार्यक्रम उरकवून टाकला. मला आमंत्रण नव्हते. पत्रिकेत माझे नाव नव्हते. मला विचारायला हवे, मला डावलून कसे चालेल? उद्धवजी संकटात आहेत. एकत्र येऊन काम करावे लागेल, कुणी गटबाजी करत असेल तर मला हे मान्य नाही”, अशी रोखठोक भूमिका चंद्रकांत खैरे यांनी मांडली.”मी मरेन पण पक्ष सोडणार नाही. तरी काही लोक काड्या करत राहतात. अनेक जण कुठे-कुठे जातात, कोण कसे एडजस्टमेंट करतात मला माहिती आहे. कार्यक्रम असा अचानक होतो का? मी स्वतः कार्यक्रमासाठी छोट्या मोठ्यांना फोन करतो. पक्ष मोठा करायचा दिलं सोडून आणि गटबाजी करतात. मी अजूनही काम करतो. अनेक लोक सोडून चालले. ते बरं नाही. आम्ही मदत करायला हवी”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.”अंबादास दानवे यांनी मला सांगितलं नाही. मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. त्यांच्याकडे तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतो, शिवसेना मी वाढवली, हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतो. तो मला बोलतच नाही. मी माझं आंदोलन करणार तो करेल ना करेल. आंदोलन आम्ही करणार आणि नक्की करणार. पक्ष चालवायचा असेल तर एकत्र पाहिजे. या माणसामुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटली, या माणसाने काय केलं सांगा. अनेक लोक सोडून जाताय”, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

  • Related Posts

    बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; खुद्द अजित पवारच उतरले रिंगणात.

    माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तब्बल ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, ज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनीही अर्ज भरला आहे. पणदरे व बारामती गटातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. छत्रपती सहकारी…

    सप्तशृंगगडावरुन झोकून दिलं, युवक-युवतीने आयुष्य संपवलं, बॉडी शेजारी-शेजारी पडल्या, तरीही…

    वणी येथील युवक अदित्य संजय देशमुख आणि फोपशी येथील मोनिका किसन शिरसाठ यांनी सप्तशृंगी गडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या शीतकड्यावरून दरीत उडी घेतली. सप्तशृंगगडावरील शीतकड्यावरून उडी मारून युवक-युवतीने आत्महत्या केली. सोमवार, दिनांक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; खुद्द अजित पवारच उतरले रिंगणात.

    बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; खुद्द अजित पवारच उतरले रिंगणात.

    सप्तशृंगगडावरुन झोकून दिलं, युवक-युवतीने आयुष्य संपवलं, बॉडी शेजारी-शेजारी पडल्या, तरीही…

    सप्तशृंगगडावरुन झोकून दिलं, युवक-युवतीने आयुष्य संपवलं, बॉडी शेजारी-शेजारी पडल्या, तरीही…

    यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस, जूनमध्ये जास्त सरी बरसणार, हवामान विभागाची मोठी अपडेट.

    यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस, जूनमध्ये जास्त सरी बरसणार, हवामान विभागाची मोठी अपडेट.

    पाचोरा – भडगाव मतदारसंघातील माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जाहीर प्रवेश.

    पाचोरा – भडगाव मतदारसंघातील माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जाहीर प्रवेश.