ठाकरेंच्या शिवसेनेतेली वाद विकोपाला, चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे, दोन मोठ्या नेत्यांमध्ये संघर्ष.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. खैरे यांनी आपण दानवे यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुरु असलेली धुसफूस अद्यापही कायम आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात एकाच पक्षात शितयुद्ध रंगलं आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्याकडून वारंवार एकत्र मिळून काम करण्याचं आवाहन केलं जात आहे. खैरे यांच्याकडून प्रचंड पोटतिडकीने एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन केलं जात आहे. खैरे यांनी आजदेखील पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. ठाकरे गटाचा नुकताच मेळावा पार पडला. या मेळव्यात खैरेंनी दांडी मारली. याबाबतही खैरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“मी मेळाव्याला दांडी मारली हे म्हणणं अतिउत्साहांचं आहे. माझा 2 महिन्यांपासून ठरलेला नागपूरमध्ये कार्यक्रम होता. तिकडे गेलो होतो. मला पक्षाच्या कालच्या कार्यक्रमाबाबत कुणी सांगितलं नव्हतं. मला कार्यकर्त्यांसोबत बोलायचं होतं. मात्र मी नसताना यांनी कार्यक्रम उरकवून टाकला. मला आमंत्रण नव्हते. पत्रिकेत माझे नाव नव्हते. मला विचारायला हवे, मला डावलून कसे चालेल? उद्धवजी संकटात आहेत. एकत्र येऊन काम करावे लागेल, कुणी गटबाजी करत असेल तर मला हे मान्य नाही”, अशी रोखठोक भूमिका चंद्रकांत खैरे यांनी मांडली.”मी मरेन पण पक्ष सोडणार नाही. तरी काही लोक काड्या करत राहतात. अनेक जण कुठे-कुठे जातात, कोण कसे एडजस्टमेंट करतात मला माहिती आहे. कार्यक्रम असा अचानक होतो का? मी स्वतः कार्यक्रमासाठी छोट्या मोठ्यांना फोन करतो. पक्ष मोठा करायचा दिलं सोडून आणि गटबाजी करतात. मी अजूनही काम करतो. अनेक लोक सोडून चालले. ते बरं नाही. आम्ही मदत करायला हवी”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.”अंबादास दानवे यांनी मला सांगितलं नाही. मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. त्यांच्याकडे तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतो, शिवसेना मी वाढवली, हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतो. तो मला बोलतच नाही. मी माझं आंदोलन करणार तो करेल ना करेल. आंदोलन आम्ही करणार आणि नक्की करणार. पक्ष चालवायचा असेल तर एकत्र पाहिजे. या माणसामुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटली, या माणसाने काय केलं सांगा. अनेक लोक सोडून जाताय”, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.

  • Related Posts

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या तांत्रिक शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. भारतीय सैन्याने टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स…

    शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.

    शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.

    शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.

    शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.

    शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमीन प्रदान.

    शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमीन प्रदान.

    जळगावमध्ये आरोग्य क्रांतीचे नवे पर्व; मेडिकल हबच्या दिशेनी समर्थ वाटचाल.

    जळगावमध्ये आरोग्य क्रांतीचे नवे पर्व; मेडिकल हबच्या दिशेनी समर्थ वाटचाल.