जिल्ह्यात गारपीटसह वादळाचा तडाखा, केळी व मका पिकांचे मोठे नुकसान.

१४ एप्रिल २०२५ । जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. यादरम्यान गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठं नासधूस झालं. १२ एप्रिल रोजी रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात व १३ एप्रिल रोजी जळगाव तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर शहरासह भोकर, भादली खुर्द परिसरामध्ये तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही केळी व मका या नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वादळामुळे बऱ्हाणपूर – अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाच्या मदतीने तत्काळ एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून, वीज वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे. उन्हाच्या तडाख्यानंतर थोडासा गारवा अनुभवास आला असला तरी गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून काही शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्याशी

दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनामार्फत बाधित भागात नुकसानीचा प्राथमिक आढावा घेण्याचे कार्य सुरू असून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत.पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, “शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता तात्काळ मदतीचा प्रस्ताव तयार करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदतीचा दिलासा देता येईल.” तसेच, हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

  • Related Posts

    महाराष्ट्रातील तिघांचा केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, दाम्पत्यासह चिमुकली दगावली, भीषण अपघातात सगळं संपलं.

    उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या जैस्वाल कुटुंबातील तिघांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला. खराब हवामानामुळे गौरीकुंडजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेमुळे केदारनाथ यात्रेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने चौकशीचे आदेश…

    तब्बल २५०० फुटांवरुन कोसळलेले विमान, २००७चा भीषण अपघात आठवतोय का, कोण आहेत नागपूरचे चंद्रशेखर?

    प्रशिक्षणार्थी पायलटचे विमान सुमारे अडीच हजार फुटांवरून खाली कोसळले. तीन कोलांटउड्या मारत, मोठ्ठा आवाज करणाऱ्या विमानाचे तुकडे तुकडे झाले. इतक्या भीषण अपघातातून कुणी वाचले असेल अशी कल्पनाही कुणाला करवत नव्हती.अमेरिकेच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महाराष्ट्रातील तिघांचा केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, दाम्पत्यासह चिमुकली दगावली, भीषण अपघातात सगळं संपलं.

    महाराष्ट्रातील तिघांचा केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, दाम्पत्यासह चिमुकली दगावली, भीषण अपघातात सगळं संपलं.

    रात्री पत्नीसोबत एकत्र जेवला, बायको भांडी घासायला गेली इतक्यात तरुणाचं घरात टोकाचं पाऊल; जळगावात हळहळ.

    रात्री पत्नीसोबत एकत्र जेवला, बायको भांडी घासायला गेली इतक्यात तरुणाचं घरात टोकाचं पाऊल; जळगावात हळहळ.

    तब्बल २५०० फुटांवरुन कोसळलेले विमान, २००७चा भीषण अपघात आठवतोय का, कोण आहेत नागपूरचे चंद्रशेखर?

    तब्बल २५०० फुटांवरुन कोसळलेले विमान, २००७चा भीषण अपघात आठवतोय का, कोण आहेत नागपूरचे चंद्रशेखर?

    मध्यरात्री तरुणाची पोलिसांसोबत अरेरावी ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

    मध्यरात्री तरुणाची पोलिसांसोबत अरेरावी ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !