दर पंधरा दिवसांनी मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडू! बच्चू कडूंचा इशारा; आंदोलन १७पर्यंत स्थगित.

कोकाटेंच्या भेटीशिवाय परतणार नसल्याचा पवित्रा कडूंनी घेतल्यानंतर पोलिसांनी कोकाटे आणि कडूंमध्ये फोनवर संवाद घडवून आणत, कर्जमाफीसंदर्भात येत्या गुरुवारी (दि. १७) मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. शेतकरी कर्जमाफीसाठी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंच्या भेटीसाठी सिन्नरकडे रवाना झालेले ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू आणि समर्थकांना पोलिसांनी मोहदरी घाटातच अडवले. परंतु, कोकाटेंच्या भेटीशिवाय परतणार नसल्याचा पवित्रा कडूंनी घेतल्यानंतर पोलिसांनी कोकाटे आणि कडूंमध्ये फोनवर संवाद घडवून आणत, कर्जमाफीसंदर्भात येत्या गुरुवारी (दि. १७) मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कडू यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी, १७ तारखेला कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही, तर दर १५ दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार, असा थेट इशाराच सरकारला दिला.विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यसरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, त्यांच्या शेतीमालास हमीभाव मिळावा, यासाठी माजी आमदार कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने शुक्रवारी कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर मशाल आंदोलन केले.

याप्रसंगी आंदोलकांनी घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली. मात्र, या मोर्चावेळी कडू यांची नाशिकला कोकाटेंशी भेट होऊ शकली नाही. कडू यांनी ‘तुम्ही कुठे आहात,’ असा प्रश्न कोकाटे यांना केला असता, ‘मी ४० किलोमीटर लांब आहे,’ असे त्यांनी सांगितले. त्यावर कडू आणि समर्थक सिन्नरकडे रवाना झाले.परंतु, पोलिसांनी मोहदरी घाटात त्यांना अडवले. यावेळी कडू यांनी कोकाटेंना भेटण्याचा हट्ट धरला. परंतु, कोकाटे यांनी आपण मतदारसंघातील गावांमध्ये यात्रांनिमित्त फिरत असल्याचे सांगत भेटण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी कोकाटे आणि कडू यांच्यात फोनवरून संवाद करून दिला. कोकाटे यांनी येत्या १७ तारखेला कर्जमाफीसंदर्भात बैठक बोलावली असल्याचे सांगत, त्यासाठी कडूंनाही आमंत्रण दिले.

त्यानंतर कडू यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. आम्ही आता १७ तारखेपर्यंत थांबत आहोत. त्यावेळी कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर दर १५ दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडू, असा इशारा त्यांनी दिला.राज्य सरकारसह आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावंर चर्चा करण्यासाठी येत्या १७ रोजी शेतकरी संघटनेसोबतच बैठकीचे आयोजन केल्याचे कोकाटेंनी कडूंना सांगितले. १७ तारखेनंतरही आम्ही तुमच्याशी चर्चा करू. तुमच्यासाठी रेड कार्पेट आहे. मी कधीही खोटे बोलत नाही. सरकार तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन कोकाटे यांनी यावेळी प्रहारच्या आंदोलकांना दिले.

  • Related Posts

    आजोबाशेजारी झोपलेली नात सकाळी गायब, गावभर शोधली अन् घराच्या शेजारीच… सोलापूरमध्ये खळबळ.

    सोलापूरच्या कुसूरमध्ये एका धक्कादायक घटनेत, जन्मदात्या बापानेच आपल्या आठ वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केला. नराधमाने हे कृत्य करून, मुलीला शेतात पुरले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील…

    रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये डॉ. अजय तावरेही सहभागी, पोर्श अपघात केसनंतर पुन्हा कचाट्यात.

    पोलिस आयुक्तालयातील जुन्या गुन्ह्यांचा निपटारा करताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नजरेस किडनी रॅकेट गुन्ह्यातील समितीचा अहवाल आला. त्यात डॉ. तावरेचे नाव असतानाही गुन्हा दाखल नसल्याचे दिसले.‘रुबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आजोबाशेजारी झोपलेली नात सकाळी गायब, गावभर शोधली अन् घराच्या शेजारीच… सोलापूरमध्ये खळबळ.

    आजोबाशेजारी झोपलेली नात सकाळी गायब, गावभर शोधली अन् घराच्या शेजारीच… सोलापूरमध्ये खळबळ.

    रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये डॉ. अजय तावरेही सहभागी, पोर्श अपघात केसनंतर पुन्हा कचाट्यात.

    रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये डॉ. अजय तावरेही सहभागी, पोर्श अपघात केसनंतर पुन्हा कचाट्यात.

    यावल वनविभागाच्या सतर्कतेमुळे सातपुडा वनक्षेत्रातील परप्रांतीयांचा शिकारीचा प्रयत्न उधळला.

    यावल वनविभागाच्या सतर्कतेमुळे सातपुडा वनक्षेत्रातील परप्रांतीयांचा शिकारीचा प्रयत्न उधळला.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप.