‘ते फक्त कोकणात मासे-मटण खाण्यासाठीच…’ नारायण राणेंचा ठाकरेंना उपरोधिक टोला; विकासनिधीवरुनही घेरले.

महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हा संघर्ष जुना आहे. उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळातील कोकण दौऱ्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हा संघर्ष जुना आहे. उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळातील कोकण दौऱ्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. ‘कोकणात उद्धव ठाकरे येतो, ते फक्त मासे मटण वडे खाण्याकरताच येतो, म्हणून मी येथील व्यवसायिकांना सांगितलं आहे. त्या दिवशी मटण वडे, मासे बंद ठेवा’ अशी उपरोधिक टीका नारायण राणे यांनी ठाकरेंवर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या बैठकीला आज खासदार नारायण राणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नारायण राणे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशांची आकडेवारी जरा मागवा. तो कोकणात येणारही नाही, नाहीतर मी तुम्हाला आकडेवारी देईन. त्याने किती पैसे सिंधुदुर्गला दिले? असाही खडा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे. मग कळेल काय अधिकार आहे त्यांना कोकणावर बोलायचा. म्हणून मी हॉटेलवाल्यांना सांगितलं की, कोंबडी वडे आणि मासे बंद करा. ज्या दिवशी तो येईल त्या दिवशी दुसरं काही करत नाही तेवढेच खायला तो येतो.चिपी विमानतळावरून आता सेवा पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाली आहे, यावर राणे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, आता इंडिगो पण येणार सगळे येणार आता ते कधी बंद होणार नाही.

देशात सगळीकडे विमान जातील येतील, यासाठी माझे प्रयत्न आहेत. पण लोकांनी प्रवास करावा आणि त्यासाठी उत्पन्न वाढावं, यासाठी माझे प्रयत्न आहेत. कोकणातील माणसांनी उद्योगधंदे करावेत हा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.नारायण राणे यांच्या या विधानानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलं आहे. राणे यांनी केलेल्या टीकेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

  • Related Posts

    महावितरणचा निष्काळजीपणा शेतकर्‍याच्या जीवावर बेतला; बापलेकाला शॉक लागून दुर्दैवी अंत, बीडच्या गेवराईतील घटना .

    बीडच्या गेवराई तालुक्यातील मारफळा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात उसाच्या शेतामध्ये खत देण्याचे काम करत असलेल्या बापलेकाला विद्युत तारेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे.बीडच्या गेवराई तालुक्यातील मारफळा…

    महाराष्ट्र-केरळ कोरोनाचे नवे हॉटस्पॉट, रुग्णांची संख्या 1010 वर, तर 10 जणांचा मृत्यू; नेमका काय आहे JN.1 व्हेरिएंट?

    देशात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढायला सुरूवात केली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोमवारी (26 मे) देशात 1010 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामध्ये…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महावितरणचा निष्काळजीपणा शेतकर्‍याच्या जीवावर बेतला; बापलेकाला शॉक लागून दुर्दैवी अंत, बीडच्या गेवराईतील घटना .

    महावितरणचा निष्काळजीपणा शेतकर्‍याच्या जीवावर बेतला; बापलेकाला शॉक लागून दुर्दैवी अंत, बीडच्या गेवराईतील घटना .

    महाराष्ट्र-केरळ कोरोनाचे नवे हॉटस्पॉट, रुग्णांची संख्या 1010 वर, तर 10 जणांचा मृत्यू; नेमका काय आहे JN.1 व्हेरिएंट?

    महाराष्ट्र-केरळ कोरोनाचे नवे हॉटस्पॉट, रुग्णांची संख्या 1010 वर, तर 10 जणांचा मृत्यू; नेमका काय आहे JN.1 व्हेरिएंट?

    शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; उपजिल्हाधिकारी येसीबीच्या जाळ्यात.

    शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; उपजिल्हाधिकारी येसीबीच्या जाळ्यात.

    नाशिकच्या जिंदाल कंपनीमागे चौकशीचा ससेमिरा, उत्पादन थांबवण्याचे आदेश, तब्बल पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ.

    नाशिकच्या जिंदाल कंपनीमागे चौकशीचा ससेमिरा, उत्पादन थांबवण्याचे आदेश, तब्बल पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ.