रेल्वेचे नागपूरला ९०३ कोटी! मुख्य स्थानकाला ५८९ तर अजनीला २९७; ‘या’ स्थानकांचाही होणार कायापालट.

 या प्रकल्पांतर्गत नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकाला ५८९ कोटी, अजनी रेल्वे स्थानकासाठी २९७कोटी आणि इतवारी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्थानकाला १७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वेस्थानकांचा समावेश करण्यात आला असून, त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकाला ५८९ कोटी, अजनी रेल्वे स्थानकासाठी २९७कोटी आणि इतवारी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्थानकाला १७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे वैष्णव म्हणाले.या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाच्या स्थानकांत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ, इत्यादींचा समावेश आहे. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे. त्यात अक्कलकोट रोड, दौड इतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड इत्यादींचा समावेश आहे. या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाउंज, फूड कोट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्केलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्याकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.यांचा होणार कायापालट

■ अजनी स्थानक : २९७ कोटी ■ नागपूर मुख्य स्थानक : ५८९ कोटी■ नेताजी सुभाषचंद्र बोस, इतवारी : १७.४ कोटी
■ मूर्तिजापूर : १३ कोटी ■ बडनेरा : ३६.३ कोटी ■ भंडारा रोड : ७.७ कोटी ■ गोंदिया : ४० कोटी ■ तुमसर रोड : ११ कोटी■ शेगाव : २९ कोटी ■ बल्लारशा : ३१.४ कोटी ■ चंद्रपूर : २५.५ कोटी ■ चांदा फोर्ट : १९.३ कोटी ■सेवाग्राम स्टेशन : १८ कोटी ■ धामणगाव रेल्वे : १८ कोटी ■ हिंगणघाट : २२ कोटी ■ पुलगाव : १६ कोटी■ वाशीम : २० कोटी

  • Related Posts

    रामानंदनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि/राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे.

    दि.३०/०५/२०२५ रोजी रामानंद नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि/राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे. सदरची बातमी मिळाताच…

    यवतमाळ: वणीजवळ सापडले दोन हजारो वर्षांपूर्वीचे गाव; संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा.

    सातवाहन आणि वाकाटक यांच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळात आजच्या वणी शहराचे प्राचीन मूळ गाव हे ‘नीरगुडा’ होते. याच गावावरून नदीला ‘निर्गुडा’ हे नाव पडले. पुढे हे आदिवासी गाव विकसित होऊन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रामानंदनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि/राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे.

    रामानंदनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि/राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे.

    यवतमाळ: वणीजवळ सापडले दोन हजारो वर्षांपूर्वीचे गाव; संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा.

    यवतमाळ: वणीजवळ सापडले दोन हजारो वर्षांपूर्वीचे गाव; संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा.

    मित्रासोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, जालन्यातील दुर्दैवी घटना.

    मित्रासोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, जालन्यातील दुर्दैवी घटना.

    RCB फायनलमध्ये पण माजी खेळाडू डिव्हिलयर्सला वाटतेय बुमराहची भीती, मिस्टर 360 डिग्री म्हणाला..

    RCB फायनलमध्ये पण माजी खेळाडू डिव्हिलयर्सला वाटतेय बुमराहची भीती, मिस्टर 360 डिग्री म्हणाला..