मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना दादांचं उत्तर, म्हणाले…

 पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे यांच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या आरोपांना उत्तर देताना अजित पवारांनी मंगेशकर कुटुंबाच्या योगदानाला तोड नसल्याचे म्हटले आहे. पुण्यातील प्रसिद्ध रूग्णालय दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये तनिषा भिसे यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. Ajit Pawar on Mangeshkr Family भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे भिसे यांना आपली पत्नी गमवावी लागली. मंगेशकर रूग्णालयाला भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार पकडलं असून आता तिसरा अहवाल समोर येणार आहे.

या प्रकरणावरून राजकारण तापलं असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर Vijay Wadettiwar Big Statement Mangeshkar Family कुटुंबावर निशाणा साधला आहे. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मंगेशकर कुटुंबाचं गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही. ज्यांनी ऑटोग्राफसाठी पैसे घ्यावेत त्यांच्याकडून काय योगदानाची ठेवायची. गाणं म्हटलं म्हणजे योगदान नाही, लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहित नाही, मी कधी ऐकलं नाही, माझ्या २५-३० वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये ऐकलं नाही, त्यामुळे या कुटंबाप्रती प्रेम आस्था असण्याचं कारण नाही, असं विजय वडेट्टीवरांनी म्हटलं आहे. यावर अजित दादांनी आपली प्रतिक्रिया देताना मंगेशकर कुटुंबाचं योगदान हे भारताला नाही जगाला माहिती असल्याचं म्हटलंय.मंगेशकर कुटुंबाचं योगदान हे भारताला नाही जगाला माहिती आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर असतील या पाचही भावंडांचं योगदान आहे त्याला तोड नाही. महाराष्ट्रीय जनतेला आपलेपणा आहे, आदर आहे त्याच्यामुळे कोणी बोलू नये असं वाटतं, असं अजित म्हणाले.

  • Related Posts

    इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला? विचारायला गेलेल्या भावाची हत्या; उचललं अन् दगडावर आपटलं.

    इन्स्टाग्रामवर घरातील पोरीचा फोटो का टाकला याचा जाब विचारायला गेलेल्या तरुणाला दगडावर उचलून आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासात पकडलं.बहिणीचा फोटो इन्स्टाग्रामवर का पाठवला…

    खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    जळगाव, ५ मे (जिमाका वृत्तसेवा) – खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खरीपपूर्व नियोजन बैठक अत्यंत महत्त्वाची असून ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षभराच्या श्रमाचे नियोजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला? विचारायला गेलेल्या भावाची हत्या; उचललं अन् दगडावर आपटलं.

    इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला? विचारायला गेलेल्या भावाची हत्या; उचललं अन् दगडावर आपटलं.

    खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    पारंपरिक वाद्य वाजवून ‘ध्वनी चित्र रंजन’ कार्यक्रमाचे उद्घाटन.

    पारंपरिक वाद्य वाजवून ‘ध्वनी चित्र रंजन’ कार्यक्रमाचे उद्घाटन.

    पाकिस्तानची आर्थिक दुर्दशा! भारताशी पंगा महागात​; युद्ध झाल्यास भिकेला लागणार, कोणी इशारा दिला?

    पाकिस्तानची आर्थिक दुर्दशा! भारताशी पंगा महागात​; युद्ध झाल्यास भिकेला लागणार, कोणी इशारा दिला?