विक्रांत राऊण्ड मारायला गेलेले, आहेत कुठे? सुट्टीवर आलेल्या २७ वर्षीय जवानाचा वेदनादायी अंत.

विक्रांत एका हत्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी चार दिवसांच्या सुट्टीवर मंगळवारी घरी आला होता, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. बुधवारी मध्यरात्री त्याची हत्या झाली.हत्येच्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी सुट्टीवर आलेल्या लष्करातील जवानाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारणपूर जिल्ह्यात घडली आहे. विक्रांत गुर्जर (२७) असे या जवानाचे नाव आहे. तो सहारणपूर जिल्ह्यातील मुदिखेडी गावचा रहिवासी होता.
जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेला विक्रांत एका हत्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी चार दिवसांच्या सुट्टीवर मंगळवारी घरी आला होता, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. बुधवारी मध्यरात्री त्याची हत्या झाली. रात्री जेवल्यानंतर विक्रांत फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर गेला होता. तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी फोनवर संपर्क साधला. मात्र त्याचा फोन बंद होता.

गुरुवारी सकाळी काही ग्रामस्थांना एका रस्त्याजवळ त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यावर, तसेच छातीवर बंदुकीच्या गोळीच्या जखमा होत्या, अशी माहिती पोलिस अधीक्षक (ग्रामीण) सागर जैन यांनी दिली.विक्रांतच्या दोन्ही बहिणी विवाहित आहेत. विक्रांत आणि त्याचा धाकटा भाऊ हर्ष यांचे अजून लग्न झाले नव्हते. हर्ष गावात राहतो आणि शेतीचे काम पाहतो. विक्रांत हा त्याचा नातेवाईक रजत याच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.बुधवारी संध्याकाळी ७ वाजता जेवण करून विक्रांत घराबाहेर पडला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.

रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. सकाळी शेतकरी शेतात जाण्यासाठी बाहेर पडले तेव्हा गोळ्या लागलेला त्याचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळला.घटनेच्या ठिकाणी ग्रामस्थांची गर्दी जमली. माहिती मिळताच सीओ एसएन वैभव पांडे आणि कोतवाली प्रभारी संजीव कुमार पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची माहिती गोळा केली. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा केले.जिल्हा एसएसपी रोहित सिंह सजवान यांनी सांगितले की, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गावात कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी, तसेच अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्यात आले आहे.

  • Related Posts

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन.

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजवटीत अत्यंत सुशासन, न्यायप्रियता, सामाजिक समता, आणि सर्वसामान्यांच्या हिताचे राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही आधुनिक भारतात आदर्श ठरावी अशी आहे. त्यांच्या विचारातून समाजाला…

    देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले…

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराज व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या एका मुलाखतीवरून महायुतीतील धुसफूस समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन.

    देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले…

    देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले…

    मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण…

    मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण…

    निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!

    निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!