केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’चा आढावा.

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’चा आढावा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करणार आदिवासी गावांचे सुक्ष्म सर्वेक्षण जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत २१ विभागांकडून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेण्यात आली.यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाला ५६ आदिवासी गाव व पाड्यांमधील मूलभूत सुविधा व विकासासाठी सूक्ष्म सर्वेक्षण आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, उपवनसंरक्षक जमीर शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचे प्रमुख डॉ.अजय पाटील,आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.यावेळी राज्यमंत्री खडसे यांनी पुढील महत्त्वाच्या सूचना दिल्या: पशुवैद्यकीय सुविधा वाढविणे: सध्या असलेल्या ६ पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये सुधारणा करणे व आवश्यकतेनुसार नवीन केंद्र उभारणे. कौशल्यविकास: आदिवासी विद्यार्थ्यांना गरजेच्या कौशल्यांचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या अहवालाच्या आधारे देण्याचे निर्देश.

एलपीजी गॅस वितरण: गरजूंना गॅस कनेक्शन देण्यासाठी विशेष प्रयत्न.कृषी उद्योग विकास: कृषी विभागाने प्रस्तावित ५३ शेतकरी गटांसाठी उद्योग व्यवसायाचे नियोजन करावे, ‘आत्मा’ प्रकल्पातून मदत मिळवून द्यावी.जलसिंचन प्रकल्प: रावेर, यावल, मुक्ताईनगर भागातील वनक्षेत्रात जलसिंचन प्रकल्प उभारून पाणी जंगलातच मुरवण्याचे नियोजन करण्यात यावे.प्रकल्पांचे कालबद्ध नियोजन: सर्व विभागांनी नियोजन ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही येत्या काही दिवसांत विभागनिहाय आढावा घेण्याचे जाहीर केले.

  • Related Posts

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन.

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजवटीत अत्यंत सुशासन, न्यायप्रियता, सामाजिक समता, आणि सर्वसामान्यांच्या हिताचे राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही आधुनिक भारतात आदर्श ठरावी अशी आहे. त्यांच्या विचारातून समाजाला…

    देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले…

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराज व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या एका मुलाखतीवरून महायुतीतील धुसफूस समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन.

    देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले…

    देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले…

    मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण…

    मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण…

    निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!

    निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!