कौटुंबिक वाद, संशय; त्याने कुऱ्हाड घेतली अन् भावाच्या बायकोच्या डोक्यात… जालना हादरलं.

जालन्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या भावाच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला आहे. या घटनेने जालन्यात एकच खळबळ माजली आहे.जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या भावजयवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने आपल्या भावजयवर संशय घेत शिवीगाळ करत कुऱ्हाडीने डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना ३ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिर्थपुरी पोलीस ठाण्यात नितीन भरत अंधारे (रा. भोगगाव, ता. घनसावंगी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी दिपाली सचिन अंधारे (वय ३३, व्यवसाय – घरकाम/शेती, रा. भोगगाव) यांनी तिर्थपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयाच्या आधारावर आरोपी नितीन अंधारे याने शिवीगाळ करत दिपाली यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

त्यानंतर आरोपीने लाथाबुक्यांनी मारहाण करत त्यांना जिवे मारण्याचीही धमकी दिल्याचा आरोप आहे.या घटनेप्रकरणी पोलीस ठाणे तिर्थपुरी येथे गुन्हा क्रमांक ५१/२०२५, भारतीय दंड संहिता (BNS) कलम १०९, ३५२, ३५१ (२) (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच सपोनि साजिद अहमद यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

सदर घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सदर घटनेतील आरोपीला आज ५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस हेड कॉन्स्टेबल नारायण माळी यांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.जालन्यातली अंबड तालुक्यातील डोमेगाव गावातील २७ वर्षीय तरुणाने लग्नाच्या १२ दिवसांपूर्वी आपल्या आयुष्याची अखेर केली. राम पांडुरंग धाईत असं या तरुणाचं नाव असून त्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेतला आहे. या तरुणाचं लग्न अवघ्या १२ दिवसांवर असताना त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.

  • Related Posts

    आणखी एक वैष्णवी! सासरच्यांचा जाच, पतीचीही साथ नाही; लग्नानंतर महिनाभरात महिलेनं आयुष्य संपवलं.

    नागपुरात सासरच्यांच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. सासरच्यांकडून हुंड्यासाठी सतत छळ केला जात असल्याने या महिलेने टोकाचा निर्णय घेतला.नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि…

    बहावलपूरमधील ‘त्या’ 21 कबरी अन् कण्हणारा मसूद अझहर; ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा मोठा पुरावा समोर.

    भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. बहावलपूरमध्ये २१ दहशतवाद्यांच्या कबरींचे फोटो समोर आले आहेत.इस्लामाबाद: भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आणखी एक वैष्णवी! सासरच्यांचा जाच, पतीचीही साथ नाही; लग्नानंतर महिनाभरात महिलेनं आयुष्य संपवलं.

    आणखी एक वैष्णवी! सासरच्यांचा जाच, पतीचीही साथ नाही; लग्नानंतर महिनाभरात महिलेनं आयुष्य संपवलं.

    बहावलपूरमधील ‘त्या’ 21 कबरी अन् कण्हणारा मसूद अझहर; ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा मोठा पुरावा समोर.

    बहावलपूरमधील ‘त्या’ 21 कबरी अन् कण्हणारा मसूद अझहर; ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा मोठा पुरावा समोर.

    शिवभक्तांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय: राज्याभिषेक दिनी मुंबई-गोवा हायवेवर ‘या’ वाहनांना बंदी!

    शिवभक्तांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय: राज्याभिषेक दिनी मुंबई-गोवा हायवेवर ‘या’ वाहनांना बंदी!

    दोन मुलांची आई २४ वर्षांच्या तरुणासोबत लिव्ह-इन मध्ये, नवऱ्याने समजावलं, पण बायको हट्टाला पेटलेली, अखेर…

    दोन मुलांची आई २४ वर्षांच्या तरुणासोबत लिव्ह-इन मध्ये, नवऱ्याने समजावलं, पण बायको हट्टाला पेटलेली, अखेर…