जळगावात उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून १२७ खतांच्या गोण्या लांबविल्या.

जळगावमध्ये एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यातच जळगाव-सुरत रेल्वे लाइनवर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून ७८ हजार रुपये किमतीच्या १२७ खतांच्या गोण्या तीन चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वेच्या आरपीएफ कार्यालयात गुन्ह्याची नोंद झाली आहे.जळगाव-सुरत रेल्वे लाइनवर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून ७८ हजार रुपये किमतीच्या १२७ खतांच्या गोण्या तीन चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वेच्या आरपीएफ कार्यालयात गुरुवारी गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी मुख्य चोरट्यासह ज्या दोन जणांना खताची विक्री केली, त्यांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून खताच्या ७५ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पिंपळकोठा येथील योगेश दिलीप बडगुजर याने त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने २६ मार्च रोजी रात्री जळगाव-सुरत लाइनवरील मालगाडीच्या एका डब्याच्या दरवाजाचे सील तोडून खताच्या १२७ गोण्या चोरल्या. बडगुजर याने त्याच्या पिकअप गाडीतून ७५ गोण्या पिंपळकोठा येथे नेल्या. १० गोण्या शेतातील झोपडीत ठेवल्या तर ३० गोण्या विशाल पाटील नामक व्यक्तीला विक्री केल्या. ३५ गोण्या या नातेवाईक लीलाधर बडगुजर याला विक्री केल्या. इतर दोन साथीदार ५७ गोण्या घेऊन पसार झाले.

रेल्वे सुरक्षा दल सुरत रेल्वे लाइनवर गस्त घालत असताना मालगाडीच्या जवळ खत सांडलेले दिसून आले. त्यांनी डब्याची पाहणी केल्यावर त्यातील १२७ १२७ गोण्या चोरी झाल्याचे उघड झाले. योगेश बडगुजर याने त्याचोरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीअंती त्याने चोरीची कबुली देऊन ज्यांना खत विक्री केले त्यांची माहिती दिली. पोलिसांनी विशाल पाटील व लीलाधर बडगुजर यांनाही अटक करून त्यांच्या घरातून व शेतातील झोपडीतून ७५ गोण्या जप्त केल्या. चोरीसाठी मदत करणाऱ्या त्या दोन चोरट्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई आरपीएफ ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. उपनिरीक्षक शिवपूजन सिंह, एस. बी. चौधरी, पंकज वाघ, विनोद जेठवे यांनी केली आहे.

  • Related Posts

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाकिस्तानने त्यांची राजधानी वाचवण्यासाठी पावले उचलली असून लाहोर ते इस्लामाबाद या क्षेत्रात विमानांना उड्डाणबंदी घालण्यात आली आहे.  पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम…

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

     पंतप्रधान मोदींकडे  प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी आपल्याच देशाला सतर्कता बाळगण्याची सूचना केलीय.जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…